
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पेपरफुटी प्रकरणी जलदगती न्यायालये स्थापन करण्याची घोषणा केली.
नवी दिल्ली प्रतिनिधी-युवकांचे कल्याण आणि भविष्यापेक्षा काहीही अधिक महत्त्वाचे नाही यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे.
पेपरफुटी प्रकरणी दोषी असलेल्यांना त्वरित आणि कठोर शिक्षा मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने जलदगती न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आपण, सर्व संबंधित यंत्रणा आणि अधिकाऱ्यांना आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत असे पंतप्रधान म्हणाले. विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले.
तरुणांच्या भविष्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले आहे.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे:
युवापिढीचे कल्याण आणि भविष्यापेक्षा काहीच अधिक महत्त्वाचे नाही.
पेपर फुटी प्रकरणात दोषी असलेल्यांना त्वरित आणि कठोर शिक्षा मिळावी हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही जलद गती न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मी या संदर्भात सर्व आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आलेत. विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सुरु असलेल्या आमच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.
जे आपल्या तरुणाईच्या भविष्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतील, त्यांना सोडले जाणार नाही.देशातल्या युवकांचे हित आणि भविष्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.



