vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नागरी सेवा देतांना येणार्‍या तांत्रिक अडचणी दूर करा – अश्विन अंबेकर

नागरी सेवा देतांना येणार्‍या तांत्रिक अडचणी दूर करा – अश्विन अंबेकर

 जालना,प्रतिनिधा) -नागरी सेवा हक्क दिन साजरा करण्याचा शासनाचा उद्देश हा नागरिकांना पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध पद्धतीने योग्य सेवादेणे हा आहे पण प्रत्यक्षात मात्र शासनाच्या वतीने नागरिकांसाठी ऑनलाईन,पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या साईट या वेगाने काम करत नाहीत तर संथगतीने होणार्‍या कामामुळे योग्य त्या वेळेत नागरिकांना सेवा मिळत नाहीत त्यामुळे या सेवांमध्ये असणार्‍या तांत्रिक अडचणी प्रथम दूर कराव्यात अशी बाब नगरसेवक अश्विन भास्करराव अंबेकर यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली

जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने आज मंगळवार २८ एप्रिल रोजी नागरी सेवाहक्क दिन साजरा करण्याच्या नियोजना संदर्भात महापालिकेच्या वतीनेमहानगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांची बैठक महापौर वंदना मगरे यांच्याअध्यक्षतेखाली व उपमहापौर राजेश राऊत, सभापती अशोकराव पांगारकर, आयुक्तअंजली शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेच्या अटलबिहारी वाजपेयीसभागृहात संपन्न झाली. यावेळी पुढे बोलताना नगरसेवक अश्विन अंबेकर म्हणाले की, त्यामुळे नागरी सेवा हक्क दिन साजरा करताना या सरकारीसेवांमध्ये येणार्‍या त्रुटी दूर केल्या तरच सामान्य नागरिकांना चांगल्यासेवा मिळतील. नागरिकांना अत्यंत संथ गतीने चालणार्‍या साईटमुळे,जन्म-मृत्यु प्रमाणपत्र, बांधकाम परवाने, विविध करांचा भरणा केल्याच्या,पावत्या यासह आदी कामांसाठी महानगरपालिकेत अनेक चकरा माराव्या लागतात.त्या थांबल्या पाहिजेत असे नगरसेवक अश्विन भास्करराव अंबेकर म्हणाले. या बैठकीस विरोधी पक्षनेते कमलेश खरे, गटनेते, दीपक राठोड, नगरसेविका दर्शनाखोतकर, निखिल पगारे, दुर्गेश कठोठीवाले, अशोक पांगरकर, विजय जाधव, दिनेश भगत, अमोल ठाकूर, संजय डुकरे, योगेश भगत यांच्यासह सर्व पक्षीय नगरसेवक व अधिकार्‍यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

रक्षाबंधन निमित्त प्रवासी वाहतुकीतून एसटीला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

अवैध सावकारांकडील 74 हेक्टर शेतजमीन शेतकऱ्यांना परत 55 प्रकरणांत गुन्हे दाखल 651 प्रकरणांची चौकशी पूर्ण…

vishwatmaklokswamivarta

फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा*१७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ, आणि धोरणकर्त्यांचा समावेश* 

vishwatmaklokswamivarta

नागपूर बुक फेस्टिव्हल – २०२५’ अंतर्गत चार दिवसीय ‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

vishwatmaklokswamivarta

महिला बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी सातारा शहरात मॉल उभारणार- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

vishwatmaklokswamivarta

घर घर संविधान’;उद्या(दि.२६) संविधान जाणीव जागृती रॅली

vishwatmaklokswamivarta