vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

लघु उद्योजकांनी “जिल्हा पुरस्कार 2024-25” करितादि.10 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावेत

लघु उद्योजकांनी “जिल्हा पुरस्कार 2024-25” करितादि.10 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावेत

 ठाणे, प्रतिनिधी- लघु उद्योजकांनी सुयोग्य तंत्रज्ञानाची, जागेची व नवीन उत्पादनाची निवड करावी आणि व्यवस्थापनातील दर्जा व त्यांच्या घटकांची निकोप वाढ व्हावी, यासाठी लघु उद्योजकांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सन 1985 पासून “जिल्हा पुरस्कार योजना” कार्यान्वित केली आहे.

अधिकाधिक लघु उद्योजकांनी त्यांच्या तंत्रज्ञान कार्यपध्दती, व्यवस्थापन, कौशल्य उत्पादकता आणि उत्पादनातील नाविन्य व संशोधन इत्यादी बाबत सुधारणा करावी यासाठी उद्योजकांना प्रेरित करण्याच्या हेतूने सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करुन पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करणे व उद्योजकतेस प्रोत्साहन देणे, ही या योजनेमागील भूमिका आहे.

शासनाने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे जिल्हा सल्लागार समितीद्वारे छाननी करुन प्राप्त अर्जामधून निवड करण्यात आलेल्या उत्कृष्ट लघु उद्योजकांना या योजनेंतर्गत प्रथम पुरस्कार विजेत्यास प्रथम पारितोषिक रु.15 हजार व द्वितीय पारितोषिक रु.10 हजार तसेच मानचिन्ह सत्कारपूर्वक प्रदान करण्यात येते.

जिल्हा पुरस्कारासाठी खालीलप्रमाणे पात्रता विहीत करण्यात आलेली आहे.

1. मागील 3 वर्षात सलग उत्पादन करीत असणारे घटक अर्ज करण्यास पात्र आहेत.

2. घटक उद्यम पोर्टलवर कमीत कमी मागील 3 वर्षांच्या कालावधीमध्ये स्थायीरित्या लघु उद्योग म्हणून नोंदणीकृत झालेले असावे.

3. नाविण्यपूर्ण उत्पादन असणाऱ्या व तंत्रज्ञानाची जोड असलेल्या उत्पादन घटकांना प्राधान्य.

4. अर्जदार वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

5. ज्या घटकांना यापूर्वी राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, असे घटक या पुरस्कारासाठी पात्र होणार नाहीत.

वरीलप्रमाणे पात्रता असणाऱ्या उत्पादन प्रवर्गातील लघु उद्योजकांनी सन 2024-25 चे पुरस्कार निवडीकरिता व योजनेचा लाभ घेण्यासाठी ठाणे जिल्हयातील जास्तीत जास्त लघु उद्योजकांनी विहीत नमुन्यात अर्ज व कागदपत्रे जिल्हा उद्योग केंद्र, एमआयडीसी कमर्शियल कॉम्प्लेक्स बिल्डिंग, 1 ला मजला मुलुंड चेक नाका (एलबीएस मार्ग), वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (प.) -400604 येथे कार्यालयीन दिवशी व वेळेत दि.10 एप्रिल 2025 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

दुय्यम निबंधक कार्यालये सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार

विधानपरिषद कामकाज :राज्यातील प्रमुख महानगरपालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी- उद्योग मंत्री उदय सामंत

नांदेड जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ईस्त्रो सहलीसाठी रवाना

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून लातूरमधील युवकांना मिळणार नामांकित कंपन्यांमध्ये कामाची संधी

मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठी राबविण्यात येणारे प्रकल्प गतीने पूर्ण करा -मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

मुंबईत आता नोंदणी न केलेला भाडेकरार आता बेकायदेशीर-ऑनलाइन नोंदणी आवश्यक….

vishwatmaklokswamivarta