vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पंतप्रधान 11 मार्च रोजी केरळ आणि तामिळनाडूला भेट देणार

पंतप्रधान 11 मार्च रोजी केरळ आणि तामिळनाडूला भेट देणार

नवी दिल्ली प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 मार्च 2026 रोजी केरळ आणि तामिळनाडूला भेट देणार आहेत. दुपारी 1:30 वाजता पंतप्रधान केरळमधील एर्नाकुलम येथे सुमारे 10,800 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण, पायाभरणी आणि हिरवा झेंडा दाखवतील. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील. त्यानंतर सायंकाळी 5:45वाजता पंतप्रधान तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे सुमारे 5,650 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. पंतप्रधान या प्रसंगी उपस्थितांना संबोधितही करतील.

पंतप्रधान एर्नाकुलममध्ये,भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) कोची रिफायनरीमध्ये पॉलीप्रोपिलीन युनिटची पायाभरणी पंतप्रधान करतील. या प्रकल्पामधील गुंतवणूक ₹5,500 कोटींपेक्षा जास्त आहे. या पॉलीप्रोपिलीन युनिटची क्षमता प्रतिवर्षी 400 किलो टन आहे. पॉलीप्रोपिलीन हे पॅकेजिंग, ऑटोमोटिव्ह घटक, वैद्यकीय उपकरणे, कापड आणि घरगुती उत्पादनांमध्ये वापरले जाणारे एक आवश्यक साहित्य आहे. या सुविधेमुळे भारताची देशांतर्गत पॉलिमर उत्पादन क्षमता मजबूत होईल, आयात अवलंबित्व कमी होईल, औद्योगिक विकासाला चालना मिळेल आणि या प्रदेशात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

रस्ते पायाभूत सुविधा क्षेत्रात पंतप्रधान दोन प्रमुख महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन करतील. पहिला प्रकल्प म्हणजे राष्ट्रीय महामार्ग-66 च्या थलापडी-चेंगळा विभागाचा सहा पदरी प्रकल्प, जो 2,650 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाने बांधला गेला आहे. हा विभाग मुंबई-कन्याकुमारी आर्थिक कॉरिडॉरचा एक भाग आहे. तो कासारगोड आणि कन्नूर जिल्ह्यांसह मंगळुरू आणि मुझापिलनगडसह शेजारच्या प्रदेशांमधील संपर्क मजबूत करेल.

या प्रकल्पामुळे कासारगोड, बेकल, पय्यानूर आणि कन्नूर यांसारख्या प्रमुख शहरांमधील संपर्क जोडणीत सुधारणा घडून येईल. यासोबतच या शहरांची अझिक्कल बंदरासोबतची जोडणीही अधिक सक्षम होईल, त्यामुळे इथल्या आणि व्यापाराला चालना मिळेल.

वेंगलम ते रामनट्टुकरा या कोझिकोड या बायपासचे सहा पदरीकरण हा याअंतर्गतचा दुसरा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 2140 कोटी रुपये इतका खर्च केला गेला आहे. या प्रकल्पामुळे सध्याच्या दुपदरी रस्त्याचा विस्तार होऊन, तो सेवा रस्त्यांसह सहा पदरी महामार्गात रूपांतरीत झाला आहे. यामुळे इथली वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल, वाहतूक क्षमतेत सुधारणा घडून येईल आणि रस्ते सुरक्षेतही वाढ होणार आहे. या विस्तारानंतर या मार्गावरचा एका तासापेक्षा जास्तीचा प्रवासाचा वेळ कमी होऊन सुमारे 15 ते 20 मिनिटांवर येईल अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे कोझिकोड समुद्रकिनारा, बेपोर बंदर आणि कप्पड समुद्रकिनारा यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांसोबतीच्या संपर्क जोडणीतही सुधारणा घेडून येईल. यामुळे या भागातील पर्यटन आणि व्यापारालाही मोठी चालना मिळणार आहे.

केरळममध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत उभारलेल्या 23 ग्रामीण रस्त्यांचेही पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत. या रस्त्यांमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील संपर्क जोडणी व्यवस्थेत मोठी सुधारणा घडून येणार आहे. यामुळे इथल्या नागरिकांना बाजारपेठा, शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगाराच्या संधींचा सुलभतेने लाभ घेणे शक्य होणार आहे. यातून इथल्या ग्रामीण भागातील उपजीविकेलाही अधिक बळकटी मिळणार आहे.

संबंधित पोस्ट

वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रात मीटर आधारित टॅक्सी सेवेसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

आपले सरकार’ पोर्टलच्या अद्ययावतीकरणामुळे १० ते १४ एप्रिल या काळात सेवांमध्ये तात्पुरती खंडितता

उत्पादकता वाढविण्यासाठी मिशन नैसर्गिक शेती राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एल.आय.टी. माजी विद्यार्थी संघटनेचा ‘उडान’ कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

सासपाडे येथील आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरवा करणार*- पालकमंत्री शंभूराज देसाई*सासपडे येथील दोन्ही पिडीत कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत*

vishwatmaklokswamivarta

विज्ञान प्रदर्शनासाठीच्या अनुदान वाढ झाल्याने संशोधन वृत्तीला बळ – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय महसूल सप्ताहाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ  सप्ताहात शेवटच्या घटकांपर्यंत लाभ द्या- जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta