vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीने नेपाळमधील निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांचे केले अभिनंदन

राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीने नेपाळमधील निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांचे केले अभिनंदन

राज्य प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे अध्यक्ष रवी लामिछाने आणि पार्टीचे ज्येष्ठ नेते बालेंद्र शाह यांच्याशी आज दूरध्वनीवरून सोहार्दपूर्ण संवाद साधला.

या दोन्ही नेत्यांना नेपाळमधील निवडणुकीत मिळवलेला विजय आणि राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. आगामी नवीन सरकारसाठी पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या. दोन्ही देशांची परस्पर समृद्धी, प्रगती आणि दोन देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी सोबत काम करण्याची भारताची वचनबद्धताही त्यांनी व्यक्त केली

भारत आणि नेपाळमधील संबंधांच्या भविष्याबद्दल त्यांनी विश्वास व्यक्त केला. दोन्ही देशांच्या संयुक्त प्रयत्नांच्या माध्यमातून परस्परांमधली भागीदारी येत्या काळात नवी उंची गाठेल, असेही पंतप्रधान म्हणाले.यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश,

राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे अध्यक्ष रवी लामिछाने आणि राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे ज्येष्ठ नेते बालेंद्र शाह यांच्याशी आज दूरध्वनीवरून सौहार्दपूर्ण संवाद साधला.

नेपाळमधील निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी मिळवलेल्या विजयाबद्दल तसेच राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल दोन्ही नेत्यांचे अभिनंदन केले. आगामी नवीन सरकारसाठी माझ्या शुभेच्छा दिल्या आणि दोन्ही देशांची परस्पर समृद्धी, प्रगती आणि कल्याणासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची भारताच्या वचनबद्धता व्यक्त केली.

परस्परांच्या संयुक्त प्रयत्नांच्या माध्यमातून येत्या काळात भारत आणि नेपाळमधील संबंध नव्या उंचीवर पोहोचतील असा मला विश्वास आहे. ĺ

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शासनाचे २८ वर्षे मुदतीचे८०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

गडचिरोलीतील नागरिकांना आता ‘स्पेक्स २०३०’ उपक्रमाद्वारे नेत्रसेवा मिळणार  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटनेचा उपक्रम

vishwatmaklokswamivarta

शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्यासाठी एकात्मिक शेती पद्धत आवश्यक – केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी संवाद कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे नवी मुंबईकर नागरिकांना जाहीर आवाहन

vishwatmaklokswamivarta

सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना; सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबतचे आश्वासन पूर्ण न झाल्याने आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा हक्कभंगाचा प्रस्ताव