गोदावरी व नर्मदा नदीच्या संगमाचा जलकलश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्त !
मुंबई प्रतिनिधी-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून श्रीक्षैत्र चौंडी व गोदा नदीचे उगमस्थान असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून गोदा ते नर्मदा जलयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. या यात्रेतून जलव्यवस्थापन व जलसंवर्धनाचा संदेश दिला गेला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा विभागाच्या वतीने जलयात्रेच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे व जळगाव जिल्ह्यातून ही यात्रा श्रीक्षेत्र महेश्वर येथे आल्यानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मा.डॉ मोहन यादव जी यांच्या उपस्थितीत यात्रेचा शानदार समारोप झाला.
जलयात्रा सांस्कृतिक अध्यात्मिक आणि दोन राज्याच्या पारंपारीक वारसा अधिक दृढ करण्याचा संकल्प होता. महेश्वर येथील ऐतिहासिक नर्मदा तिरावर जलपूजन करण्यात आले. गोदावरी व नर्मदा नदीच्या संगमाचा जलकलश जलसंपदामंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्त केला.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार रामराव वडकुते, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.