vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी: माटुंगा ते मुलुंड दरम्यान रविवारी मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक ..

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी: माटुंगा ते मुलुंड दरम्यान रविवारी मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक ..

मुंबई प्रतिनिधी-मध्य रेल्वेचा 10 मे रोजी रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. हा मेगाब्लॉक जवळपास 4 ते 45 तासांचा असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हा मेगाब्लॉक प्रवाशांचे हाल करणार असल्याच दिसून येत आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड दरम्यान तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. कसा असेल मेगाब्लॉक, कोणत्या वेळेत प्रवास करणं टाळा.

ठाण्यापलीकडील जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकादरम्यान थांबणार आहेत. यामध्ये 15 मिनिटांची तफावत पाहायला मिळेल.

मध्य रेल्वेप्रमाणेच ट्रान्स हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक असणार आहेत. अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर लाईनवरील ठाणे आणि वाशी नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या दरम्यान वाशी, नेरळ आणि ठाणे स्थानकांदरम्याव अप आणि डाऊन अशा सेवा रद्द केल्या जाणार आहेत.

पश्चिम रेल्वेचा शनिवारी 9 मे रोजी मेगाब्लॉक असमार आहे. बोरिवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान हा मेगाब्लॉक असणार आहे. 9 मे (शनिवार) आणि 10 मे (रविवार) च्या मध्यरात्री विशेष नाईट जम्बो ब्लॉक घेण्यात येईल.  रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही मोठा ब्लॉक नियोजित नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेला रविवारी मेगाब्लॉक नसेल.

संबंधित पोस्ट

अमरावती तालुक्यात ‘फार्मर कप’साठी शेतकरी प्रशिक्षण संपन्न

vishwatmaklokswamivarta

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ महिलांसाठी आरोग्य शिबीर१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विशेष अभियान

vishwatmaklokswamivarta

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या मोसमी पाऊस सर्वत्र सक्रिय, मंत्रीमंडळ बैठकीत आढावा

जाहीरात विषयक जाहीर आवाहन

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती व भटक्या जमाती उमेदवारांसाठी राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती;ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

लोकप्रतिनिधींची उत्तरदायित्वाची भावना हाच सशक्त लोकशाहीचा पाया – 86व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत प्रा. राम शिंदे यांचे प्रतिपादन• उत्तरदायित्व ही केवळ पाच वर्षांतून एकदा येणारी निवडणुकीपुरती मर्यादित प्रक्रिया नाही; ती प्रत्येक क्षणाची सततची जबाबदारी आहे…• विधिमंडळ हे अभ्यासपूर्ण चर्चेचे व्यासपीठ असावे; गडबड-गोंधळासाठीचे नव्हे…

vishwatmaklokswamivarta