vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यात वादळी वारा आणि पाऊस वीज पडल्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू वृत्त

उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यात वादळी वारा आणि पाऊस वीज पडल्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू वृत्त

राज्य प्रतिनिधी-उत्तर प्रदेशात वादळी पाऊस आणि वीज पडल्याच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये ४३ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. भदोही जिल्ह्यात सर्वाधिक १५ मृत्यूंची नोंद झाली आहे.

याशिवाय, मिर्झापूरमध्ये १०, फतेहपूरमध्ये ९, बदाऊनमध्ये ५, तर बरेलीत ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बहुतांश मृत्यू हे वीज पडल्यानं, भिंत कोसळल्यानं आणि वेगाच्या वाऱ्यामुळे झाडे अंगावर पडल्यानं झाले आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनांची तातडीनं दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तसेच, बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत पुरवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

संबंधित पोस्ट

व्हाईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

vishwatmaklokswamivarta

रेलवन ॲपचे उद्घाटन : सर्व प्रवासी सेवांसाठी एक-थांबा उपाय

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी प्रस्तावित योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उल्हास वैतरणा कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन

केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या पात्र उमेदवारांना माहिती सादर करण्यासाठी २१ मार्चपर्यंतची मुदत; गुणपडताळणीही उपलब्ध

पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;अर्जासाठी 30 जूनपर्यंत पुन्हा संधी, नवीन वेळापत्रक जाहीर– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

वाघिणीला नव्हे तर तिच्या शावकाला परतवाडा येथे हलविले; वन विभागाचे स्पष्टीकरण..