उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यात वादळी वारा आणि पाऊस वीज पडल्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू वृत्त
राज्य प्रतिनिधी-उत्तर प्रदेशात वादळी पाऊस आणि वीज पडल्याच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये ४३ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. भदोही जिल्ह्यात सर्वाधिक १५ मृत्यूंची नोंद झाली आहे.
याशिवाय, मिर्झापूरमध्ये १०, फतेहपूरमध्ये ९, बदाऊनमध्ये ५, तर बरेलीत ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बहुतांश मृत्यू हे वीज पडल्यानं, भिंत कोसळल्यानं आणि वेगाच्या वाऱ्यामुळे झाडे अंगावर पडल्यानं झाले आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनांची तातडीनं दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तसेच, बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत पुरवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.