vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यात वादळी वारा आणि पाऊस वीज पडल्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू वृत्त

उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यात वादळी वारा आणि पाऊस वीज पडल्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू वृत्त

राज्य प्रतिनिधी-उत्तर प्रदेशात वादळी पाऊस आणि वीज पडल्याच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये ४३ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. भदोही जिल्ह्यात सर्वाधिक १५ मृत्यूंची नोंद झाली आहे.

याशिवाय, मिर्झापूरमध्ये १०, फतेहपूरमध्ये ९, बदाऊनमध्ये ५, तर बरेलीत ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बहुतांश मृत्यू हे वीज पडल्यानं, भिंत कोसळल्यानं आणि वेगाच्या वाऱ्यामुळे झाडे अंगावर पडल्यानं झाले आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनांची तातडीनं दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तसेच, बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत पुरवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

संबंधित पोस्ट

नेहरु युवा केंद्रातील राष्ट्रीय युवा स्वयंसेवकासाठी अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी

ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचे होणार पर्यावरणीय पुनरुज्जीवन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला ‘झिरोधा’चा प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या मुजुमदार पार्क सोसायटीतील प्रथम वर्षीय सार्वजनिक गणेशोत्सव धुमधडाक्यात…

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

vishwatmaklokswamivarta

आज उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सांगली जिल्हा दौरा..

vishwatmaklokswamivarta