vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत टेक-महाइम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह २०२६ चा उद्घाटन सोहळा संपन्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत टेक-महाइम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह २०२६ चा उद्घाटन सोहळा संपन्न

राज्य प्रतिनिधी- मुंबईच्या प्रेसिडेंट हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत टेक-महाइम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह २०२६ चा उद्घाटन सोहळा संपन्न

महाराष्ट्राच्या डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासातील एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत टेक-महाइम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह २०२६ चा उद्घाटन सोहळा पार पडला. माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमात २४ सामंजस्य करारांद्वारे (MoUs) ₹१५५.७५ कोटींच्या CSR निधीची भागीदारी करण्यात आली.

‘महा सारथी’ आणि ‘आपले सरकार’ यांसारख्या अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून राज्याच्या सक्षम डिजिटल पायाभूत सुविधांना कॉर्पोरेट क्षेत्राची प्रभावी जोड देत, नागरिकांपर्यंत अधिक गतिमान, पारदर्शक आणि सर्वसमावेशक डिजिटल सेवा पोहोचविण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.

हा कॉन्क्लेव्ह म्हणजे विकसित, डिजिटलदृष्ट्या सक्षम आणि सर्वसमावेशक महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने उचललेले एक परिवर्तनकारी पाऊल आहे. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या ध्येयपूर्तीसाठी शासन, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्र यांची ही अभूतपूर्व भागीदारी निश्चितच नवे आदर्श निर्माण करणारी ठरणार आहे.

संबंधित पोस्ट

परीक्षा केंद्राच्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू…

vishwatmaklokswamivarta

मध्यप्रदेश येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल सोसायटी महूच्या वतीने जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील प्राध्यापक डॉ.जलबा नरवडे यांना मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांच्या हस्ते भीम रत्न पुरस्कार…

आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी अग्निशमन केंद्र उपयुक्त ठरेल- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अग्निशमन केंद्र, कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा…

राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार..

जिल्ह्यातील ६९३ ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर-– जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta