vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट गाठण्यासाठी क्षमता बांधणी आराखडा महत्त्वाचा- अपर मुख्य सचिव व्ही. राधा

विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट गाठण्यासाठी क्षमता बांधणी आराखडा महत्त्वाचा- अपर मुख्य सचिव व्ही. राधा

पुणे प्रतिनिधी

विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या क्षमता विकासाचा विचार करावा लागेल. त्यासाठी क्षमता बांधणी आराखडा निर्मिती हा महत्त्वाचा टप्पा असून अधिकाऱ्यांनी कर्तव्यासोबत नव्या गोष्टी जाणून घेत आपली वैयक्तिक प्रगती साधण्याचा आनंद घेण्यासाठी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी केले.

 

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे क्षमता बांधणी आराखड्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. कार्यशाळेला यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे, उपमहासंचालक सचिन कलंत्रे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव नीता शिंदे, डिजिटल लर्निंग लॅब प्रमुख कल्याणी गोखले, संचालक शाहूराज मोरे आदी उपस्थित होते.

श्रीमती व्ही. राधा म्हणाल्या, प्रशासनाच्या शेवटच्या स्तरावरील कर्मचाऱ्याच्या क्षमता बांधणीचा विचारही आराखडा तयार करताना करायचा आहे. प्रत्येक पदासाठी आवश्यक कौशल्य, तंत्रज्ञान आदींचा विचार करून प्रशिक्षण वेळापत्रक तयार करावे. प्रत्येक पदानुसार कर्तव्य आणि जबाबदाऱ्या निश्चित करून त्याअनुषंगाने आराखडा तयार करावा. कार्यात्मक आणि वर्तणूक संदर्भातील क्षमतांना विविध टप्प्यात आत्मसात करण्याजोगा प्रशिक्षण आराखडा तयार करावा.

अधिकाऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून क्षमता बांधणी आराखडा तयार करण्यात घेतलेला पुढाकार लक्षात घेता महाराष्ट्र हे क्षमता बांधणी कार्यक्रमात अग्रेसर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उत्तम कार्यक्षमतेद्वारे चांगली सेवा देण्यासाठी आणि त्या माध्यमातून राज्याला विकासाच्या वाटेवर पुढे नेण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

डॉ. दिवसे यांनीदेखील यावेळी मार्गदर्शन केले. नियमाधारित ऐवजी भूमिका आधारित प्रशासनाचा विचार करून क्षमता बांधणी आराखडा तयार करायचा आहे. विभागाच्या क्षमता, कार्य याबाबत आराखड्यामुळे संकल्पना स्पष्ट होतात. शिवाय या प्रशिक्षण आराखड्याला पदोन्नती आणि सेवा विषयक बाबींशी जोडण्यात येणार असल्याने अत्यंत सूक्ष्मरितीने आराखडा तयार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

यावेळी श्री. कलंत्रे यांनी क्षमता बांधणी आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले आणि अधिकाऱ्यांच्या शंकाचे निरसन केले. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण केले.00000

संबंधित पोस्ट

ओटीटी क्रांती; वैयक्तिकरण, तंत्रज्ञान आणि कथांवर स्ट्रीमिंगचे भविष्य नेटफ्लिक्स, सोनी, जिओ हॉटस्टारचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञांचे मत

बार्टीतर्फे अकोल्यात ग्राफिक्स डिझायनिंगचे प्रशिक्षणअनुसूचित जाती प्रवर्गातील युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन

राज्यातील विद्यापीठांमध्ये सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम राबविण्यात येईल – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

नेत्राआरआयटी फॉउंडेशन* व *राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि* यांच्या संयुक्त विद्यमाने *सारथी योजनेतील लाभार्त्यांचा प्रमाणपत्र वितरण

मोबाईल वापरकर्त्यांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी ‘संचार साथी’ पोर्टल आणि अ‍ॅप

vishwatmaklokswamivarta

नागरिकांनी ई-कचरा संकलन अभियानात सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta