महाराष्ट्र हे देशाचे वित्तीय इंजिन असून, राज्याचा समावेशक व प्रगतीशील विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीच्या समन्वयातून महाराष्ट्र अधिक समृद्ध होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
महाराष्ट्र हे देशाचे वित्तीय इंजिन असून, राज्याचा समावेशक व प्रगतीशील विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीच्या समन्वयातून महाराष्ट्र अधिक समृद्ध होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
मुंबई प्रतिनिधी 📍 ‘टेक महाइम्पॅक्ट २०२६’ परिषद, मुंबई,महाराष्ट्र हे देशाचे वित्तीय इंजिन असून, राज्याचा समावेशक व प्रगतीशील विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीच्या समन्वयातून महाराष्ट्र अधिक समृद्ध होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी टेक महा इम्पॅक्ट परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.
राज्य अधिक समावेशक, समृद्ध आणि भविष्यवेधी बनवण्याचा दृढ संकल्प टेक महा इम्पॅक्ट परिषदेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. ‘तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि सीएसआर निधीच्या माध्यमातून समुदायांचे सक्षमीकरण हे आज आपल्या राज्याच्या विकासाचे मूळ सूत्र आहे. जोपर्यंत शासन, तंत्रज्ञान आणि कॉर्पोरेट क्षेत्र एकमेकांच्या हातात हात घालून चालत नाहीत, तोपर्यंत प्रगतीचे फायदे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू शकत नाहीत. महिला, तरुण, ग्रामीण भाग आणि समाजातील वंचित घटकांपर्यंत विकासाची फळे पोहोचवणे हे सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट आहे, असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी सांगितले