vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

नागरिकांनी ई-कचरा संकलन अभियानात सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

नागरिकांनी ई-कचरा संकलन अभियानात सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जालना, प्रतिनिधी- जिल्हाधिकारी कार्यालय व नॅचर इको बिल्डींग प्रायव्हेट लिमिटेड या केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ नोंदणीकृत संस्थेच्या सहकार्याने जिल्हास्तरीय ई-कचरा संकलन अभियान दि.28 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्याकडे असलेला ई-कचरा जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात जमा करुन या अभियानात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

भारतामध्ये दरवर्षी 1.6 दशलक्ष टनापेक्षा अधिक ई-कचरा निर्माण होतो या कचऱ्यापैकी बऱ्याच कचऱ्याची विल्हेवाट ही अनाधिकृत मार्गाने केल्याने त्याचे गंभीर परिणाम पर्यावरणावर होताना दिसून येत आहेत. जिल्हातील नागरिकांना ई-कचऱ्याचा वैज्ञानिक व पर्यावरणपुरक निपटारा करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी दि.28 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत भारत सरकारच्या खाण मंत्रालय व जवाहरलाल नेहरुन ॲल्युमिनीयम रिसर्च डेव्हलपमेंट ॲण्ड डिझाईन सेंटरच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतोत्सव अभियानांतर्गत नेचर इको बिल्डींग प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात ई-कचरा संकलन अभियान आयोजित करण्यात आले आहे. सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाच्या कार्यालयातील आपल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या घरातील वापरात नसलेले संगणक, प्रिंटर, मॉनिटर, मोबाईल, बॅटरी, युपीएस, फॅक्स मशिन, स्कॅनर आदि ई-कचऱ्याचे वर्गीकरण करुन जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात संकलन करावे. ई-कचरा संकलन करतेवेळी मुल्य प्रति युनिट/किलो प्रमाणे दिले जाणार आहे. ई-कचरा संकलन अभियानाचा उद्देश कार्यालयामधून तसेच घरगुती स्तरावर निर्माण होणारा ई-कचरा सुरक्षित आणि पर्यावरणपुरक पध्दतीने संकलित करुन त्याचा योग्य निपटारा करणे हा आहे. ई-कचरा उघड्यावर फेकणे, जाळणे किंवा तोडफोड केल्याने त्यातील शिसे, पारा, कॅडमियम इत्यादी विषारी घटक माती, हवा आणि भुजलात मिसळून प्रदुषण निर्माण करतात व सार्वजनिक आरोग्यावर दुष्परिणाम करतात. नोंदणीकृत पुनर्वापरकर्त्याकडे ई-कचरा सुपूर्द केल्यास प्रदुषण रोखता येते तसचे पुनर्वापर योग्य धातू व घटक सुरक्षितरित्या पुर्नप्राप्त करता येतात. अशी माहितीही त्यांन यावेळी दिली.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

आज भारतात बनवलेली पहिली युद्धनौका 🇮🇳 INS अर्नाला नौदलात सामील!

नागरिकांच्या शारिरीक व आध्यात्मिक विकासासाठी 21 जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करावे- जिल्हाधिकारी संतोष पाटील

अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश प्रकीया सुरु*

vishwatmaklokswamivarta

दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि मंत्रिमंडळाने  घेतली शपथ…

vishwatmaklokswamivarta

जनसंवादातून सुशासनाकडे’तंत्रज्ञानातून प्रशासन गतिमान करण्याचा जिल्हाधिकारी यांचा अभिनव उपक्रमØ दुर्गम भागातील नागरिकांना दूरदृष्यप्रणालीद्वारे थेट मांडता येतील समस्याØ जिल्हाधिकारी, सिईओ, एसपी व सर्व जिल्हास्तरीय अधिकारी राहणार उपस्थित

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता १० वी व १२वी च्या परीक्षा २४ जून ते १६ जुलै होणार. परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडाव्या यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी प्रवीण फुलारी यांनी मनाई आदेश जारी