vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यातंत्रज्ञानप्रदेश

जालना ‘सुपर 50 एआय फार्मर्स’ प्रकल्पाचा शुभारंभ; ऊस शेतीत तंत्रज्ञानाची नवी क्रांती..

जालना ‘सुपर 50 एआय फार्मर्स’ प्रकल्पाचा शुभारंभ; ऊस शेतीत तंत्रज्ञानाची नवी क्रांती..

जालना प्रतिनिधी: जालना जिल्ह्यात ऊस शेतीत तंत्रज्ञानाची नवी क्रांती घडवून आणण्याच्या दिशेने ‘सुपर 50 एआय फार्मर्स’ या अभिनव पायलट प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र कृषी विभाग आणि फाईंडेबिलिटी सायन्सेस (Findability Sciences) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती अधिक सक्षम करण्याचा यामागचा उद्देश आहे.

जालना जिल्ह्याच्या 45 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘रायझिंग जालना’ या विशेष सोहळ्यात या प्रकल्पाच्या सामंजस्य कराराची (MoU) घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाला पालकमंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, निवडलेले शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी तसेच फाईंडेबिलिटी सायन्सेसची टीम उपस्थित होती.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील 50 प्रगतिशील शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या शेतांची सॅटेलाइटच्या माध्यमातून सतत पाहणी केली जाणार असून, गोळा झालेल्या डेटाचे एआय तंत्रज्ञानाद्वारे विश्लेषण केले जाणार आहे. या विश्लेषणाच्या आधारे शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल अॅपवर अचूक, वेळेवर आणि शेतानुरूप सूचना मिळणार आहेत.

या अॅपमध्ये पीक आरोग्य स्कोअर, शेतातील विविध भागांतील वाढीचा अभ्यास, पाणी व खत व्यवस्थापनासाठी शिफारसी, तण ओळख आणि कापणी नियोजन यांसारखी महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. विशेष बाब म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त सेन्सर्स किंवा उपकरणांची गरज भासणार नाही, ज्यामुळे खर्चात बचत होऊन अधिकाधिक शेतकरी या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकतील.

‘सुपर 50 एआय फार्मर्स’ प्रकल्पामुळे जालना जिल्ह्यातील ऊस शेती अधिक कार्यक्षम, उत्पादक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित बनण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भविष्यात हा पायलट प्रकल्प यशस्वी ठरल्यास, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही अशा प्रकारच्या उपक्रमांचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

संबंधित पोस्ट

बेटी बचाओ बेटी पढाओ’ राज्यस्तरीय अभियानाचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

नांदेड येथील “हिंद-दी-चादर” कार्यक्रम ऐतिहासिक करावा, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांचा समावेश आवश्यक मान्यवरांचे पत्रकार परिषदेत आवाहन 

vishwatmaklokswamivarta

मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

जम्मू आणि पंजाबमधील पूरपरिस्थितीला भारतीय हवाई दलाने दिला झटपट प्रतिसाद

गणेशोत्सवासाठी रेल्वे स्थानकांवर तिकीट व सुविधा,चाकरमान्यांच्या प्रवासासाठी रेल्वे सज्ज. 380 गणपती विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था.

एम-सॅन्ड (कृत्रिम वाळू) उत्पादित करण्यास इच्छुक व्यावसायिकांनी संगणक प्रणालीवर महाई-सेवा केंद्र किंवा वैयक्तीकरीत्या अर्ज करावेत..