vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्वाधार योजनेचे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

स्वाधार योजनेचे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

जालना प्रतिनिधी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या किंवा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते. 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विदयार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील मुलां मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणीक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते. शैक्षणिक वर्ष 2025-26 स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 31 डिसेंबर, 2025 पर्यंत वाढविण्यात आली होती. तसेच Send Back केलेल्या अर्जाबाबत पाठपुरावा करुन विद्यार्थ्यांकडून कागदपत्रांची पुर्तता करुन घेणे आवश्यक होते. सदर विद्यार्थ्यांना 5 मे, 2026 पर्यंत आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत देण्यात येत आहे. विहीत मुदतीत त्रुटी पुर्ण करून कागदपत्रांची पुर्तता केली नाही तर पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यास अर्ज करता येणार नाही व तो स्वाधार योजनेपासून वंचित राहिल. अर्ज फेर सादर न केल्यास अर्ज अपात्र/बाद ठरतील. असे आवाहन समाज कल्याण विभागाचे विशेष अधिकारी स्नेहल मोदाळे शासकीय निवासी शाळा जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ महिलांसाठी आरोग्य शिबीर१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विशेष अभियान

vishwatmaklokswamivarta

देशाची आरोग्य व्यवस्था जगात सर्वात सक्षम आणि मोठी- केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केली ‘कुंभमेळा’ विकास कामांची पाहणी सिंहस्थ कुंभमेळा २०२७

प्राचीन भारतातील औषध व उपचार पध्दती आजही लाभदायक- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर महाआरोग्य शिबीर संपन्न..

vishwatmaklokswamivarta

जनगणना २०२७ प्रशिक्षण जनगणनेच्या कामात सक्रीय सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta

सियाल इंडिया २०२५ मध्ये ‘उमेद’चा डंका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे ‘उमेद’ महिलांची उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचणार