vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

समाजकारणाच्या मजबुतीसाठी राजकारण महत्त्वाचे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मित्र परिवारातर्फे भावपूर्ण सत्कार,वेगळ्या विदर्भाला पाठिंबा असल्याचे केंद्रीयराज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे मत*  

समाजकारणाच्या मजबुतीसाठी राजकारण महत्त्वाचे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मित्र परिवारातर्फे भावपूर्ण सत्कार,वेगळ्या विदर्भाला पाठिंबा असल्याचे केंद्रीयराज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे मत*

नागपूर/ मुंबई प्रतिनिधी: वेगळा विदर्भ झाल्यास महाराष्ट्र आणि विदर्भ असे दोन मुख्यमंत्री होतील व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल, त्यामुळे वेगळ्या विदर्भाला आमचा पाठिंबा आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.

ना. रामदास आठवले यांची राज्यसभेच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल नागपूर येथील मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता वसंतराव नाईक स्मृती सभागृहात (वनामती) करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. हा सत्कार कृष्णा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस कराडचे प्रमुख सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पुरण मेश्राम अध्यक्षतेत हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव अनिल हिरेखाग, बाळू घरडे, श्रीराम काळे, नीलेश खांडेकर, विजय आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते.

नागपुरातील मित्र परिवाराने केलेल्या या सत्काराचे महत्त्व असून यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे, समाजकारणाच्या मजबुतीसाठी राजकारण महत्त्वाचे आहे, असे ना. रामदास आठवले म्हणाले, नागपूरच्या भुमीत डॉ. आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतल्यामुळे या शहराचे वेगळे महत्त्व असल्याचे सांगून त्यांनी त्यांच्या नेहमीच्या खुमासदार शैलीत अनेक शीघ्र कविता सादर करीत उपस्थितांना मनमुराद हसवले.

00000

संबंधित पोस्ट

परिचारिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजिटल प्रमाणपत्रांच्या वितरणाचा शुभारंभ…परिचारिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजिटल प्रमाणपत्रांच्या वितरणाचा शुभारंभ…

जिल्हाधिकाऱ्यांची अवैध उत्खननावर धडक कारवाई ३ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त…

vishwatmaklokswamivarta

विकसित भारताला अधिक सशक्त बनवणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प- मंत्री जयकुमार रावल…

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शासन प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर…**नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शासकीय सूचनांचे पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर ५ फेब्रुवारीला मतदान; ७ फेब्रुवारीला मतमोजणी – राज्य निवडणूक आयुक्त

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने अंतिम मतदार यादी सुधारित कार्यक्रम जाहीर-विक्रांत चव्हाण-उपजिल्हाधिकारी (महसूल)

vishwatmaklokswamivarta