vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

समाजकारणाच्या मजबुतीसाठी राजकारण महत्त्वाचे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मित्र परिवारातर्फे भावपूर्ण सत्कार,वेगळ्या विदर्भाला पाठिंबा असल्याचे केंद्रीयराज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे मत*  

समाजकारणाच्या मजबुतीसाठी राजकारण महत्त्वाचे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मित्र परिवारातर्फे भावपूर्ण सत्कार,वेगळ्या विदर्भाला पाठिंबा असल्याचे केंद्रीयराज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे मत*

नागपूर/ मुंबई प्रतिनिधी: वेगळा विदर्भ झाल्यास महाराष्ट्र आणि विदर्भ असे दोन मुख्यमंत्री होतील व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल, त्यामुळे वेगळ्या विदर्भाला आमचा पाठिंबा आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.

ना. रामदास आठवले यांची राज्यसभेच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल नागपूर येथील मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता वसंतराव नाईक स्मृती सभागृहात (वनामती) करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. हा सत्कार कृष्णा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस कराडचे प्रमुख सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पुरण मेश्राम अध्यक्षतेत हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव अनिल हिरेखाग, बाळू घरडे, श्रीराम काळे, नीलेश खांडेकर, विजय आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते.

नागपुरातील मित्र परिवाराने केलेल्या या सत्काराचे महत्त्व असून यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे, समाजकारणाच्या मजबुतीसाठी राजकारण महत्त्वाचे आहे, असे ना. रामदास आठवले म्हणाले, नागपूरच्या भुमीत डॉ. आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतल्यामुळे या शहराचे वेगळे महत्त्व असल्याचे सांगून त्यांनी त्यांच्या नेहमीच्या खुमासदार शैलीत अनेक शीघ्र कविता सादर करीत उपस्थितांना मनमुराद हसवले.

00000

संबंधित पोस्ट

मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा-मराठी भाषा मंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा,बदनापूर येथे प्रवेशासाठी 20 जुन 2026 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

केंद्र पुरस्कृत शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थींना द्यावा- खासदार विशाल पाटील- दिशा समितीच्या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा

शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय…साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल…

vishwatmaklokswamivarta

पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची कामे पूर्ण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

सातारा जिल्ह्यातील सर्व खाजगी कार्यालयांनी तक्रार निवारण समितीची नोंदणी केंद्र शासनाच्या SHE BOX PORTAL करणे बंधनकारक