
‘बकरी ईद’ निमित्त सोसायट्यांमध्ये होणारी पशूंची अवैध हत्या प्रशासनाने रोखावी!- रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
मुंबई प्रतिनिधी- सोसायटींमध्ये पशूंची हत्या न करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. असे असूनही मीरा-भाईंदरसारख्या मुसलमानबहुल भागांतील सोसायट्यांमध्ये बकरी ईदनिमित्त हत्या करण्यासाठी पशूंना आणले जात आहे. बकरी ईदनिमित्त सोसायट्यांमध्ये अशा प्रकारे होणारी पशूंची अवैध हत्या प्रशासनाने रोखावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले आहे. याविषयी श्री. रमेश शिंदे यांनी मंत्रालयात वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना मुलाखत दिली.
यावेळी श्री. रमेश शिंदे म्हणाले, ‘‘बकरी ईदनिमित्त सोसायट्यांमध्ये बकर्या आणून त्यांना कापले जाते. या वेळी रक्तमिश्रित पाणी आजूबाजूच्या होळी, गणेशोत्सव आदी हिंदूंच्या सणांच्या वेळी हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार, तसेच पुरोगामी मंडळी प्रदूषण होत असल्याची आवई उठवून ते रोखण्याचे आवाहन करण्यासाठी पुढे येतात. बकरी ईदनिमित्त पशूंच्या अवैध हत्या करून रक्तमिश्रित पाण्यामुळे होत असलेल्या रोगाच्या प्रादूर्भावाविषयी ही मंडळी का पुढे येत नाहीत ? असा प्रश्न या वेळी श्री. रमेश शिंदे यांनी या वेळी उपस्थित केला.
श्री. रमेश शिंदे,राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती



