vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण 34 टक्के भरले महाबळेश्वर महसूल मंडळात 393 मि.मी. पाऊस- जिल्हाधिकारी संतोष पाटील

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण 34 टक्के भरले महाबळेश्वर महसूल मंडळात 393 मि.मी. पाऊस- जिल्हाधिकारी संतोष पाटील

 

सातारा, प्रतिनिधी: सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील धरणामधील पाणीसाठा वाढला आहे. महाराष्ट्रा भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाची प्रकल्पीय क्षमता 105.25 टीएमसी असून यामध्ये 7 जुलै सकाळी 10 वाजेपर्यंत 35.71 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण 33.93 टक्के भरले असून धरणातील आवक 93 हजार क्युसेक्सने होत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

7 जुलै अखेर जिल्ह्यात 288.7 मि.मी. पर्जन्यमान झाले असून पावसामुळे नदी, नाले, ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. 7 जुलै रोजी सातारा जिल्ह्यात 22 महसूल मंडळांमध्ये 65 मि.मी. पेक्षा जास्त पर्जन्यमान झाले आहे. यामध्ये महाबळेश्वर महसूल मंडळामध्ये सर्वाधिक म्हणजेच 392.8 मि.मी. पाऊस झाला आहे. त्या खालोखाल लामज, बामणोली, तापोळा या महसूली मंडळांमध्ये 169 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वाठार 148.5 मि.मी., करहर आणि केळघर या दोन ठिकाणी 124.5 मि.मी., पाचगणी 136.5 मि.मी., पसरणी 110.3 मिमी., पाटण 100.5 मि.मी.,

महाबळेश्वर तालुक्यातील नावली येथील 7, धावली येथील 17 आणि रुळे येथील 8 अशा एकूण 32, जावली तालुक्यातील बहुले येथील 23 आणि बोंडारवाडी येथील 8 अशा 31, वाई तालुक्यातील जांभळी येथील 22 आणि डोईचीवाडी येथील 5 नागरिकांचे अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, नातेवाईक, मंदिरे आदी सुरक्षीत ठिकाणी तात्पुरते स्थलांतरण करण्यात आले आहे.

पाटण तालुक्यातील 39, सातारा तालुक्यातील 9, खंडाळा तालुक्यातील 2, जावली तालुक्यातील 11, वाई तालुक्यातील 13, महाबळेश्वर तालुक्यातील 9 अशा 83 घरांची पडझड झाली आहे. या घरांच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सातारा तालुक्यातील केरी येथील प्राथमिक शाळेचे पत्रे उडाल्यामुळे तर खंडाळा तालुक्यातील मिरजे येथील प्राथमिक शाळा व स्मशानभूमीचे भिंत पडून नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सखोल भागात पाण्या साचणाऱ्या, धबबधेच्या ठिकाणी निर्बंध घालण्यात आले आहेत.

सातारा जिल्ह्यातील धरणांची सद्यस्थिती पुढील प्रमाणे. आजचा एकूण पाणीसाठा, कंसात प्रकल्पीय एकूण क्षमता टीएमसीमध्ये आणि आजची एकूण टक्केवारी.

कोयना – 35.71 टीएमसी (105.25 टीएमसी,) टक्केवारी 33.93 टक्के, धोम – 6.59 टीएमसी (13.5 टीएमसी,) टक्केवारी 48.81 टक्के, धोम-बलकवडी- 2.17 टीएमसी (4.08 टीएमसी,) टक्केवारी 53.19 टक्के, कण्हेर – 6.29 टीएमसी (10.10 टीएमसी,) टक्केवारी 62.28 टक्के, उरमोडी – 4.50 टीएमसी (9.96 टीएमसी,) टक्केवारी 45.18 टक्के, तारळी – 1.73 टीएमसी (5.85 टीएमसी,) टक्केवारी 29.57 टक्के.

पावसामुळे झाड कोसळने, दरड कोसळने, रस्ता खचणे असे प्रकार होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अशा वेळी यंत्रणांनी सजग राहून तात्काळ कार्यवाही करावी व रस्ते वाहतुकीसाठी खुले करावेत. धोकादाय ठिकाणी दरड प्रवण क्षेत्रांमध्ये नागरिकांच्या सुरक्षतेला प्राधान्य देत तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले आहेत.

0000

संबंधित पोस्ट

केंद्र शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा— खा. श्रीरंग बारणे,जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकानजीक झालेल्या एका दुर्दैवी अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण,मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाउंट वर माहिती दिली आहे

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी -भाजप नेते आणि नंदीग्रामचे आमदार शुभेंदु अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या,  कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश…

उन्हाळी क्रीडा कौशल्य प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन जास्तीत जास्त खेळाडूंनी शिबिरात सहभाग घ्यावा

अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती पारदर्शक पद्धतीने;कुठल्याही आमिषाला बळी पडू नका

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला रस्ते विकास, पाणी पुरवठा योजनेचा आढावाअतिक्रमण हटाव मुळे बेघर झालेल्या परिवारांना मोफत घरे देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta