vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

लोकायुक्त न्या. कानडे यांच्याकडून ५३ वा अहवाल राज्यपालांना सादर

लोकायुक्त न्या. कानडे यांच्याकडून ५३ वा अहवाल राज्यपालांना सादर

मुंबई, प्रतिनिधी-

राज्याचे लोकायुक्त न्या. वि. मु. कानडे (नि.) यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना आपल्या कामकाजासंबंधीचा ५३ वा वार्षिक अहवाल सादर केला.महाराष्ट्र लोकायुक्त आणि उपायुक्त अधिनियम, १९७१ च्या कलम १२ पोटकलम (६) नुसार, २०२५ मधील लोकायुक्त व उपायुक्त यांच्या कामकाजासंबंधी हा अहवाल आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

लोकायुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार २०२५ या अहवालाधीन वर्षात लोकायुक्त कार्यालयाकडे ८५४७ नवीन तक्रारी प्राप्त झाल्या. त्या पैकी ३८६९ तक्रारी स्वाक्षरी विरहित व इतर प्राधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या अर्जाच्या प्रति असल्यामुळे नोंदविण्यात आल्या नाहीत. अशा प्रकारे अहवालाधीन वर्षात ४६७८ नवीन तक्रारी नोंदविण्यात आल्या. 

वर्षाच्या सुरुवातीला ४२८७ प्रकरणे प्रलंबित होती. अशा प्रकारे २०२५ मध्ये ८९६५ प्रकरणे कार्यवाहीकरिता उपलब्ध झाली.

नोंदणी केलेली ४८८५ प्रकरणे अहवालाधीन वर्षात निकाली काढण्यात आली आणि २०२५ च्या वर्षअखेरीस ४०८० प्रकरणे प्रलंबित राहिली, असे लोकायुक्त कार्यालयाकडून नमूद करण्यात आले.

 

महाराष्ट्रातील लोक आयुक्त संस्थेने गेल्या पाच दशकांमध्ये अनेक तक्रारदारांची गाऱ्हाणी दूर केली असून गेल्या काही वर्षात ८२.७१ टक्क्यांपेक्षा जास्त तक्रारींमधील तक्रारदारांच्या गाऱ्हाण्यांचे निवारण करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

०००००

संबंधित पोस्ट

महिलांच्या हक्काचा विरोध करणाऱ्यांना जनता माफ करत नाही!” – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोकसभेत स्पष्टोक्ती 

तणाव हीच ताकद’ कार्यालयीन तणाव व्यवस्थापनावर परिसंवादात मंथन

स्वच्छ जल,स्वच्छ मन’ मोहीमेंतर्गत नवी मुंबईत जलाशय व परिसर स्वच्छतेच्या ठिकठिकाणी विशेष मोहीमा

vishwatmaklokswamivarta

मेट्रो २ बी मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण अखेर निश्चित,डायमंड गार्डन – चेंबूर ते मंडाळे या पाच पूर्णांक सहा किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन येत्या चार डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

vishwatmaklokswamivarta

रस्तासुरक्षाअभियान २०२६चा #नांदेड मध्ये शुभारंभ#अपघात रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

समाजाच्या शेवटच्या घटकाचे कल्याणकरण्याची राज्य शासनाची भूमिका- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे- मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात – 21 स्टॉलमधून शासनाच्या योजनांची माहिती प्रदर्शित विविध शासकीय योजनांचा 3 हजार 800 हून अधिक लाभार्थींना लाभ वाटप