vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मेट्रो २ बी मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण अखेर निश्चित,डायमंड गार्डन – चेंबूर ते मंडाळे या पाच पूर्णांक सहा किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन येत्या चार डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

मेट्रो २ बी मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण अखेर निश्चित झाले आहे. डायमंड गार्डन – चेंबूर ते मंडाळे या पाच पूर्णांक सहा किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन येत्या चार डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

मुंबई प्रतिनिधी- मुंबईतील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या मेट्रो २ बी मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण अखेर निश्चित झाले आहे. डायमंड गार्डन – चेंबूर ते मंडाळे या पाच पूर्णांक सहा किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन येत्या चार डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने केले आहे. या उद्घाटनामुळे मुंबईच्या पूर्व उपनगरातील लाखो प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि सुकर होणार आहे.

अंधेरी पश्चिम ते मंडाळे – चेंबूर या संपूर्ण मेट्रो २ बी मार्गिकेचा डायमंड गार्डन ते मंडाळे हा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. सुमारे पाच पूर्णांक सहा किलोमीटर लांबीच्या या उन्नत मार्गिकेवर प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांची पूर्तता करण्यात आली आहे. हा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यापूर्वी आवश्यक असलेले मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्याने मेट्रो सुरू करण्यातील मोठा तांत्रिक अडथळा दूर झाला आहे. हा मार्ग चेंबूर, मानखुर्द आणि मंडाळे या पूर्व उपनगरांना थेट मेट्रो नेटवर्कशी जोडणार आहे. सध्या या भागात रेल्वे आणि रस्त्यांवर प्रचंड ताण असतो. मेट्रो सुरू झाल्यावर या भागातील हजारो प्रवाशांना लोकल ट्रेन किंवा रस्त्यावरील वाहतुकीवर अवलंबून राहावे लागणार नाही, ज्यामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होईल आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.मेट्रो २ बी च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण यापूर्वी दोन वेळा पुढे ढकलण्यात आले होते,

चार डिसेंबर हा दिवस केवळ मेट्रोसाठीच नाही, तर मुंबई महानगर प्रदेशाच्या पायाभूत सुविधांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबई आणि ठाण्यातील वाहतुकीला नवी दिशा देणाऱ्या दोन मोठ्या प्रकल्पांचाही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते याच दिवशी प्रारंभ होणार आहे. मुंबईतील महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचा भाग असलेल्या ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह भुयारी बोगद्याच्या कामाला या दिवशी सुरुवात होणार आहे. बोगद्याच्या खोदकामासाठी आवश्यक असणारे टनेल बोरिंग मशीन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जमिनीखाली उतरवले जाईल. हा भुयारी मार्ग पूर्ण झाल्यावर दक्षिण मुंबईतील वाहतूक अधिक जलद होणार आहे.

संबंधित पोस्ट

पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून विभागाचा आढावा-पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देणार,पर्यावरण विभागातील कामांमध्ये लोकसहभाग घेत पर्यावरणपूरक वातावरणासाठी विशेष प्रयत्न करणार- पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद प्रश्नोत्तरे :प्रत्येक जिल्ह्यात आदर्श वसतीगृह उभारणार वसतीगृहांसाठी १५०० कोटी रुपयांची तरतुद- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

रेणापूर मध्यम प्रकल्पातून रेणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू

एसएनसीयू व बालकांवरील उपचारांसाठी सर्वतोपरी उपाययोजना; आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करणार- मंत्री प्रकाश आबिटकर

पॅनल पध्दतीने प्रथमत:च मतदान होत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व्यापक जनजागृती

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत6 एप्रिल रोजी अयोध्या यात्रेसाठी विशेष रेल्वेचे आयोजन· जिल्ह्यातील 800 लाभार्थी करणार अयोध्येकडे प्रस्थान..