vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत6 एप्रिल रोजी अयोध्या यात्रेसाठी विशेष रेल्वेचे आयोजन· जिल्ह्यातील 800 लाभार्थी करणार अयोध्येकडे प्रस्थान..

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत6 एप्रिल रोजी अयोध्या यात्रेसाठी विशेष रेल्वेचे आयोजन· जिल्ह्यातील 800 लाभार्थी करणार अयोध्येकडे प्रस्थान..

 

जालना, प्रतिनिधी : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचा शासन निर्णयानुसार राज्यातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहुन अधिक वयाच्या जेष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याकरीता मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र शासनामार्फत सुरु करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातील 800 लाभार्थ्यांना रविवार, दि. 6 एप्रिल, 2025 ते दिनांक 10 एप्रिल, 2025 या कालावधीत जालना येथुन अयोध्या श्रीराम मंदीर यात्रेसाठी विशेष रेल्वे प्रस्थान करणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व इतर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यात्रेसाठी जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील 800 लाभार्थ्यांना तीर्थ दर्शनासाठी नेण्यात येणार असुन, सदर लाभार्थ्यांची यापुर्वी जिल्हास्तरीय समितीने निवड केली आहे. सदर पात्र लाभार्थ्यांची यादी सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय जालना येथे लावण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पात्र लाभार्थ्यांने तीर्थदर्शन यात्रेसाठी आपल्या सोबत वैद्यकीय प्रमाणत्र, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो व आवश्यकता असल्यास औषधे व इतर आवश्यक वस्तु सोबत ठेवाव्यात असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी केले आहे.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

जालना शहरातील अनेक युवकांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

मंत्री उदय सामंत यांनी घेतली स्वागताध्यक्ष शरद पवार यांची भेट ९८ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन, नवी दिल्ली

vishwatmaklokswamivarta

अंगणवाडी आता फक्त पोषणाचे केंद्र नव्हे, तर उज्ज्वल, सक्षम आणि सुसंस्कारित भावी पिढी घडवण्याचे महत्त्वपूर्ण केंद्र बनल्या आहेत, अशा शब्दात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी अंगणवाडी सेविकांच्या समर्पित कार्याचे कौतुक

vishwatmaklokswamivarta

खानापूरच्या गणेश बुरूजाचे नगरपंचायतीकडे हस्तांतरण जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आदेश सुपूर्द- पुरातन बुरूजाच्या सुशोभिकरणातून शहराच्या वैभवात भर- देखभाल, दुरूस्तीसह वृक्षारोपणाची अट…

vishwatmaklokswamivarta

मुंबईत धारावी रामरवाडी तील घटना-  एका बेकायदेशीर बांधकामाचे भिंत कोसळून:2 कामगार  गंभीर जखमी सायन रुग्णालयात दाखल, महानगर पालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

vishwatmaklokswamivarta

कृषी क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार– कृषिमंत्री कोकाटे

vishwatmaklokswamivarta