vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची पदभरती प्रक्रिया वेगात पूर्ण करावी – जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील बैठकीस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची पदभरती प्रक्रिया वेगात पूर्ण करावी – जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील-

बैठकीस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई, प्रतिनिधी  :– महात्मा फुले कृषी विद्यापीठाची 2025 मध्ये सुरू करण्यात आलेली पद भरती प्रक्रिया वेगात पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. मंत्रालयात जनसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राहुरी कृषी विद्यापीठाशी संबंधित विषयांबाबत बैठक झाली. या बैठकीस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्राजक्त तनपुरे, कृषी सचिव परिमल सिंह , उपसचिव प्रतीक्षा पाटील, वित्त आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच राहुरी येथील कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे दूरदृश्यप्रणाली द्वारे सहभागी झाले होते.

 

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले , महात्मा फुले कृषी विद्यापीठमधील प्रकल्पग्रस्त प्रतीक्षा यादीतील प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले होते. 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत सामावून घेतले होते. त्याच्या जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीबाबत योग्य विचार करण्यात येईल. यावेळी 2025 मध्ये वर्ग क आणि वर्ग ड मधील पद भरती प्रक्रियेमध्ये आरक्षण पदांवरील नियुक्ती , ई डब्ल्यू एस व एस सी बी सी प्रवर्गातील पदांवर उमेदवारांची नियुक्तीच्या अनुषंगाने कार्यवाही बाबत माहिती देण्यात आली.

 

विद्यापीठाच्या वर्ग क आणि ड वर्गातील रिक्त पदांसाठी 2025 मध्ये अर्ज मागविण्यात आले होते. क वर्ग यादृष्टीने विद्यापीठ प्रशासनाने कार्यवाही करताना गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे, निवड आणि प्रतीक्षा यादीची प्रक्रिया केली जावी असे कृषिमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले. 2005 नंतर नियुक्त प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मागणी बाबत सकारात्मक असून याबाबत सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागाकडे कार्यवाही साठी पाठवण्यात यावा, अशी सूचना यावेळी दिली.

2025 च्या भरती प्रक्रियेमधील वर्ग ड पदांसाठी शासन नियमानुसार निवड प्रक्रिया राबवून 143 पदांवर नियुक्ती देण्यात आली. परंतु वर्ग क पदांमधील भरती प्रक्रियेसाठी नियमानुसार परीक्षा आयोजित करून उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. तसेच यातील निवड यादी व प्रतीक्षा यादी अंतिम होणे बाकी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

00000

संबंधित पोस्ट

डाक सेवांमध्ये डिजिटल क्रांती; आय.टी. 2.0 अप्लिकेशनचे कार्यान्वयन सोमवारी(4 ऑगस्ट) जिल्ह्यातील डाक सेवा बंद

vishwatmaklokswamivarta

आदिवासी बांधवांसोबत वनजागेवरील २५ हजार झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पुनर्वसनाला गती

vishwatmaklokswamivarta

पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासा-कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन 

मुंबईतील उंच इमारतींसाठी अग्निसुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यात येणार- मंत्री उदय सामंत

भिवंडी मध्ये हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू…

vishwatmaklokswamivarta

जिल्हाप्रशासन देणार शेतकऱ्यांना ‘हात मदतीचा’