vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भिवंडी मध्ये हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू…

भिवंडी मध्ये हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू…

ठाणे प्रतिनिधी: राज्यातील रस्ते अपघाताचे  प्रमाण सातत्याने वाढत असून अपघाती मृत्यूदरही वाढल्याचं दिसून येत आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात घडल्याची बातमी माध्यमांतून समोर येते. आता, मुंबई–नाशिक महामार्गावर सोनाळे परिसरात झालेल्या भीषण अपघातात भिवंडीतील  दोन ऑटो रिक्षा चालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अज्ञात वेगवान वाहनाने ऑटो रिक्षाला दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात घडला आहे. याप्रकरणी, पोलीस दफ्तरी अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील घुंघट नगर परिसरात राहणारे ऑटो चालक राजकुमार गुप्ता (वय 40 वर्षे) आणि महेंद्र केसरवानी (वय 39 वर्षे) हे दोघेही एकाच ऑटो रिक्षातून (MH 04 KA 3124) भिवंडी बायपासमार्गे सोनाळे दिशेने जात होते. दरम्यान, त्यांची ऑटो रिक्षा मुंबई–नाशिक महामार्गावरील  सोनाळे जवळ पोहोचताच मागून आलेल्या एका अज्ञात वेगवान वाहनाने जोरदार धडक दिली. वाहनाची धडक इतकी भीषण होती की ऑटोमधील दोघे चालक रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी तत्काळ दोन्ही जखमींना उचलून भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नव्या रिक्षा परवान्यांना स्थगिती,वाहतूक कोंडी रोखणे, प्रदूषणाला आळा घालणे यासाठी राज्य शासनाने नव्या रिक्षा परवान्यांवर बंदी आणली आहे. याबाबत मुंबई मधील रिक्षा चालकांची समिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. बहुतांश रिक्षा चालकांनी याचे स्वागत केले आहे. तर, तरुण रिक्षा चालकांनी हे रोजगाराचे साधन असल्याने असे करू नये, अशी मागणी केली आहे. मात्र, राज्य सरकारने नव्या रिक्षांना आता परवाने देण्यावर स्थगिती दिली असून आजपासूनच हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे नेते नवाबभाई मलिक पक्षाचे अध्यक्ष सुनिल गिरी यांच्या हस्ते पार्टीच्या मुंबई प्रदेश सचिवपदी आसिफ खान पठाण यांची नियुक्ती ..

vishwatmaklokswamivarta

देशाची अन्नसुरक्षा, आर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची – राज्यपाल जिष्णू देव वर्मा,महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३९ वा पदवीप्रदान समारंभ संपन्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित-शाश्वत शेतीसाठी सर्व घटकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवनिर्मित उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मीरा-भाईंदर येथे-दुचाकी, चार चाकी, परिवहन व ऑटो या नवीन मालिका सुरू

महाराष्ट्रात गुटखाबंदीसाठी स्वतंत्र कायदा आणणार-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर-पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात निधीचे वितरण 

vishwatmaklokswamivarta

वसमत नगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हटवणार- उद्योग मंत्री उदय सामंत