vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी  :-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाजातील युवक-युवतींना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने लोकशाहीर अण्णाभाऊ शिष्यवृत्ती योजाना राबविण्यात येत आहे. इ.१० वी, इ.12 वी, पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये 60% पेक्षा जास्त गुण घेऊन उतीर्ण झालेल्या विध्यार्थी-विध्यार्थिनीना गुणानुक्रमे निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी 28 जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत.

शिष्यवृत्तीसाठी अर्जासोबत साध्या कागदावर जिल्हा व्यवस्थापक सातारा याचे नाव अर्ज, पासपोर्ट साईज फोटोसह), गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, जातीचा दाखला, आधार कार्ड व पुढील अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्याचा पुरावा जोडणे आवश्यक आहेत.

शिष्यवृत्तीचे अर्जासाठी व अधिक माहितीसाठी महामंडळाच्या कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, १ ला मजला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, २२ अ, जुनी एमआयडीसी रोड, बॉम्बे रेस्टॉरंट पुलाजवळ, सातारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक नरेंद्र वाघमारे यांनी केले आहे.

 

संबंधित पोस्ट

मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा-भारतीय हवामान विभाग

नगर भूमापन कार्यालय मिरज येथे बुधवारी फेरफार अदालत

vishwatmaklokswamivarta

मेळघाट हाटमध्ये खादी महोत्सवाला सुरवात खादीचा वापर वाढविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग वरंध घाट मार्ग वाहतुकीसाठी खुला

शाळेच्या दर्शनी भागात शैक्षणिक शुल्का बाबत माहिती देणारे फलक सर्व शाळांनी लावावेत- जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

समस्त जनसमुदायाचा सदैव ऋणी राहील मी…महेंद्र गोडभरले*तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, रेणापूर

vishwatmaklokswamivarta