vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

गोरेगाव मतदारसंघातील *मोतीलाल नगर क्रमांक १,२ व ३* च्या पुनर्विकासाबाबत*आमदार व माजी राज्यमंत्री विद्या ठाकुर* यांच्या मार्गदर्शनाखाली रहिवाशांसोबत चर्चा सत्राचे आयोजन

गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील *मोतीलाल नगर क्रमांक १,२ व ३* च्या पुनर्विकासाबाबत*आमदार व माजी राज्यमंत्री विद्या ठाकुर* यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक रहिवाशांसोबत चर्चा सत्राचे आयोजन

मुंबई प्रतिनिधी  गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील *मोतीलाल नगर क्रमांक १,२ व ३* च्या पुनर्विकासाबाबत आज *आमदार व माजी राज्यमंत्री विद्या ठाकुर* यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक रहिवाशांसोबत चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रहिवाशांसोबत संवाद साधताना *आमदार महोदयांनी* आपण काल,आज आणि उद्या कायम रहिवाशांसोबत आहोत आणि त्यांचे म्हणणे सरकारपर्यंत पोचवण्यासाठी कटिबद्ध आहोत तसेच गेली ४ वर्षे आपण १६०० फुटाच्या घराची करत असलेली मागणी आता म्हाडाने मान्य केली आहे असे सांगितले. यावेळी *महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर,नगरसेवक संदीप पटेल, सुशील चव्हाण, विजय गायकवाड, बलवंत वर्मा,अमेय मोरे,मिलिंद वाडेकर,राजन कांबळी,किशोर ठाकुर* आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

मुंबईत तिसऱ्या लाटेला सुरुवात; कोविड टास्क फोर्स सदस्यांची माहितीकोरोना विषाणुच्या (Covid19) दुसऱ्या लाटेत मोठं नुकसान सहन केल्यानंतर आज पुन्हा संपुर्ण देश तिसऱ्या लाटेच्या (Third Wave) उंबरठ्यावर उभा असल्याचं दिसत आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणुच्या रुग्णांची संख्या वाढायला सुरूवात झाली असून, त्यामध्ये काही अंशी ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरीअंटने बाधित रुग्णांचा देखील समावेश आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी काल पत्रकारांशी संवाद साधताना रुग्णवाढीबद्दल चिंता व्यक्त केली असून, निर्बंध वाढवावे लागू शकतात असंही म्हटलं आहे. त्यातच आता आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबईत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच काल दिवसभरात मुंबईत २५१० रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील काल सकाळीच मुंबईतील रुग्णवाढीबद्दल चिंता व्यक्त केली होती. मुंबईत यावर्षी २० जानेवारी दरम्यान ३०० केसेस होत्या आता त्या १३०० ते २२०० पर्यंत पोहोचतील. त्यामुळे ७ पटीने हा दर वाढला आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी काल दिली होती. त्यातच राज्याच्या कोविड -१९ टास्क फोर्सचे सदस्य (Covid19 Task Force) डॉ. शशांक जोशी (Dr. Shasank Joshi) यांनी इंडीया टुडेशी बोलताना मुंबईत तिसऱ्या लाटेला सुरूवात झाल्याचं म्हटलं आहे. हेही वाचा: ओमिक्रॉन व कोरोनाच्या व्हॅरिएंटना नामोहरम करणाऱ्या प्रतिपिंडांचा शोध राज्यातील ही परिस्थिती पाहता सावधगिरी बाळगावी लागणार आहे. परंतु घाबरून जाण्याची गरज नाही. कारण आतापर्यंत जे रुग्ण आढळून आले असले तरी, या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आढळून आली असल्याने याचा रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांवर फारसा ताण पडत नाही. जीनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून 80% प्रकरणांमध्ये ओमिक्रॉन असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे मुंबईत तिसरी लाट सुरू झाली आहे अशी माहिती टास्क फोर्सचे सदस्य शशांक जोशी यांनी दिली.

vishwatmaklokswamivarta

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकासाठी अर्ज करण्याचे आवाहन१० जूनपर्यंत अर्जाची मुदत

महाराष्ट्र शासनाचे ९ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 :प्रोत्सहानपर योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणिकरणास 18 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ…

vishwatmaklokswamivarta

बुलडाण्यातील 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 8 जुलैला राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

नवी मुंबईत नेरूळच्या वंडर्स पार्कमध्ये भीषण दुर्घटना थोडक्यात टळली.  दुसऱ्याच दिवशी अपघात, सात जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर…