
ठाणे व पालघर जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या पालकांसाठी आनंदाची बातमी शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
ठाणे, प्रतिनिधी): जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे व पालघर यांच्या कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, युद्ध विधवा आणि त्यांच्या अधीन असलेल्या पालकांसाठी (मुलामुलींसाठी) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत, ज्या पालकांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये शालांत परीक्षा (इयत्ता १० वी), उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता १२ वी), डिप्लोमा तसेच पदवी परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त करून यश संपादन केले आहे आणि जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये पुढील उच्च शिक्षण घेत आहेत, असे पात्र विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील.
अर्जाबाबत महत्त्वाची माहिती: अर्जाची अंतिम तारीख: १५ ऑक्टोबर २०२६, अर्ज सादर करण्याचे ठिकाण: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे. अधिक संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक: ०२२-४५६४१५९३ / ९९२००१६५८०.
तरी सर्व पात्र माजी सैनिकांनी व त्यांच्या कुटुंबातील संबंधित सदस्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि निश्चित मुदतीपूर्वी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे येथे सादर करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.
00000



