vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

खतांची आगाऊ बुकिंग आता एफएफएस प्रणालीद्वारे

खतांची आगाऊ बुकिंग आता एफएफएस प्रणालीद्वारे

लातूर, प्रतिनिधी : शेतकऱ्यांना अनुदानित रासायनिक खते वेळेत व आवश्यक प्रमाणात उपलब्ध व्हावीत, यासाठी लातूर जिल्ह्यात पुढील काही दिवसांत फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल (FFS) ई-प्रणाली लागू करण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना खतांची आगाऊ बुकिंग करता येणार असून, त्यामुळे रांगा व गर्दी टाळून उपलब्धतेनुसार खताची खरेदी करता येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी दिली.

सध्या रासायनिक खतांची विक्री कृषी सेवा केंद्रांमार्फत ई-पॉस मशीनद्वारे केली जाते. नव्या FFS प्रणालीमुळे खत बुकिंगची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी या प्रणालीचा वापर करावा, असे आवाहनही श्री. जाधव यांनी केले आहे.

अशी असेल प्रक्रियाप्रथम महाराष्ट्र राज्याची निवड करून आधारद्वारे पडताळणी करावी. आधार ओटीपी आणि ई-केवायसीद्वारे ओळख निश्चित करावी. यासाठी शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) किंवा सातबारा आवश्यक असेल.

यानंतर पिकाची आणि आवश्यक खताची निवड करावी. युरिया, डीएपी, एमओपी, एनपीकेएस, एसएसपी आदी उपलब्ध खतांमधून निवड करता येईल.त्यानंतर आपल्या परिसरातील उपलब्ध साठा असलेल्या विक्रेत्याची निवड करावी. बुकिंग पूर्ण झाल्यानंतर क्यूआर कोड किंवा टोकन क्रमांक मिळेल. हा क्यूआर कोड किंवा टोकन दाखवून तीन दिवसांच्या आत संबंधित विक्रेत्याकडून खताची खरेदी करावी.

आगाऊ बुकिंगमुळे वेळेची बचत होणार असून, गर्दी आणि लांब रांगा टाळता येतील. तसेच जवळच्या विक्रेत्याकडे खताची उपलब्धता निश्चित होऊन योग्य वेळी खत मिळण्यास मदत होणार आहे.

FFS ॲप कुठे मिळेल?‘Framework for Fertilizer Sale’ हे कृषी मंत्रालयाचे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.https://play.google.com/store/apps/details?id=com.agristack.fsasही सुविधा वैयक्तिक शेतकरी तसेच कौटुंबिक शेतकरी किंवा त्यांच्या प्रतिनिधीसाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी गावातील सहाय्यक कृषी अधिकारी किंवा तालुकास्तरीय कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) यांच्याशी संपर्क साधावा, असेही जाधव म्हणाले.

संबंधित पोस्ट

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर*

सिंहस्थ कुंभमेळा; जिल्ह्याचा ८७१९ कोटी रुपयांचा प्राथमिक विकास आराखडा सर्वसमावेशक नियोजन करण्यावर भर द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मांजरखेड येथे बांबू परिषद उत्साहात

vishwatmaklokswamivarta

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान‘मिशन महाग्राम’राबवून गावे समृद्ध करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले

vishwatmaklokswamivarta