vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जलसंधारण सप्ताहःप्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमुळे पाणलोट विकासात वाढ

जलसंधारण सप्ताहःप्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमुळे पाणलोट विकासात वाढ

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जलसंधारण ही लहान लहान उपाययोजनांमधून साधली जाणारी मोठी किमया आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या लहान लहान उपाययोजनांनी जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रात विकासात वाढ झाली आहे. जिल्ह्यात खुलताबाद, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर आणि पैठण या तालुक्यात ही कामे झाली आहेत.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत ही कामे घेण्यात आली आहेत. त्यात वैयक्तिक उत्पादन पद्धतीत शेतकऱ्यांना लाभ देण्यात येऊनही मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक थेंबाद्वारे मोठे उत्पादन (Per Drop More Crop) हे उद्दिष्ट साधण्यास यश आले आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीवर तर झाला आहेच शिवाय शेतकऱ्यांच्या मातीची गुणवत्ता व पाणी बचतीवरही झाला आहे

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, गंगापूर, पैठण, खुलताबाद या तालुक्यातील 62 गावांमध्ये एकून 678 कामे राबविण्यात आली. त्यात शेततळे, ग्रॅबियन स्ट्रकचर, दगडी बांध, सिमेंट नाला बांध, माती बांध, माती नाला बांध, बांधालगत समतल चर, रिचार्ज शाफ्ट इ. जलसंधारण उपचार राबविण्यात आले. गेल्या वर्षभरात ही कामे झाली. त्यावर 15 कोटी 27 लक्ष 35 हजार रुपये इतका खर्च झाला असून त्याद्वारे 2241.53 सहस्त्र घनमिटर इतकी साठवण क्षमता योजना अंमलात आल्यापासून निर्माण झाली आहे.

त्याचप्रमाणे वैयक्तिक उत्पादन पद्धतीसाठी शेतकऱ्यांना दिलेला लाभांमध्ये याच गावांमध्ये 2033 लाभार्थ्यांना पीव्हीसी पाईप, विद्युत पंप, ठिबक संच, तुषार सिंचन संच अन्य कृषी यंत्रे व अवजारे इ. देण्यात आले. त्यावर 4 कोटी 77 लक्ष 67 हजार रुपये इतका खर्च करण्यात आला. त्यातूनही शेतकऱ्यांच्या सिंचनाची गुणवत्ता सुधारुन पाण्याची बचत व उत्पादनात वाढ ह्या दोन्ही गोष्टी साध्य झाल्या. शिवाय नियंत्रित सिंचन दिल्यामुळे जमिनीचा ओलावा टिकून मातीची गुणवत्ता सुधारली, हा दीर्घकालीन फायदा झाला.

०००००

संबंधित पोस्ट

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थाचे योगदान महत्त्वपूर्ण- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

भाजपा जालना महानगर मंडळाच्या नवनियुक्त अध्यक्षांचा माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते सत्कार

सुषमा स्वराज या अष्टपैलू प्रतिभावंत राजकारणी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

आज पासूनमुंबई-कोकण जोडणारी Ro-Ro फेरी सेवा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू

vishwatmaklokswamivarta

पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे साजरा करण्यात आला ७७ वा प्रजासत्ताक दिन सोहळा

vishwatmaklokswamivarta

अमरावती जिल्ह्यात दर्यापुर-अमरावती मार्गावरच्या लाखापुर येथे झालेल्या एस टी बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर १० जण गंभीर जखमी