आज पासून मुंबई-कोकण जोडणारी Ro-Ro फेरी सेवा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू
मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारने दक्षिण आशियातील सर्वात वेगवान Ro-Ro (Roll-On Roll-Off) फेरी सेवेला हिरवा कंदील दिला आहे. ही सेवा मुंबईला कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्गशी जोडणार असून १ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे.
Ro-Ro फेरीद्वारे प्रवासी आपले वाहन थेट बोटीत चढवून प्रवास करू शकतात आणि गंतव्यस्थानी उतरवू शकतात. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक, इंधन खर्च आणि वेळेची मोठी बचत होणार आहे.
🎉 गणेशोत्सवात प्रवाशांना दिलासा,परंपरागत मुंबई-गोवा महामार्गावरील प्रचंड ट्रॅफिक आणि गजबजलेल्या रेल्वे मार्गांचा त्रास टाळण्यासाठी ही फेरी उपयुक्त ठरणार आहे. विशेषत: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा सोयीची ठरेल
📍 प्रवास वेळ
मुंबई ते रत्नागिरी (जायगड) – फक्त ३ ते ४ तास मुंबई ते सिंधुदुर्ग (विजयदुर्ग) – ५ ते ६ तास🚢 क्षमता व सुविधा ५० कार, ३० दुचाकी, मिनीबस व मोठे बस वाहतूक करण्याची सोय
मिनीबस: ₹13,000 | 30-सीटर बस: ₹14,500 45-सीटर बस: ₹17,000 | मोठी बस: ₹21,000👉 नितेश राणे यांनी या प्रकल्पाला “कोकणाच्या इतिहासातील सुवर्णक्षण” असे संबोधले आहे.