नेपाळमधील पूरस्थितीचा संभाव्य परिणाम लक्षात घेता, बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी राज्यातील सीमावर्ती बगहा, वाल्मीकीनगर, बेतिया आणि मोतिहारी भागांचा हवाई पाहणीद्वारे आढावा घेतला.
यावेळी संभाव्य परिणाम, आवश्यक खबरदारी, नागरिकांची सुरक्षितता तसंच मदत आणि बचावकार्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सज्जतेनं आवश्यक ती सर्व पावलं उचलण्याचे निर्देश देण्यात आले.