vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राखीच्या धाग्यातून स्वच्छतेचं आणि पर्यावरणाचं नातं!

राखीच्या धाग्यातून स्वच्छतेचं आणि पर्यावरणाचं नातं!

नवी मुंबई प्रतिनिधी-रक्षाबंधनानिमित्त नवी मुंबईतील विविध शाळांमध्ये विद्यार्थिनींनी आपल्या स्वच्छता दूतांना टाकाऊ साहित्यापासून तयार केलेल्या राख्या बांधून पर्यावरणपूरक रक्षाबंधन साजरे केले. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करताना विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीवही रुजवण्यात आली.

नेरूळ येथील एपीजे शाळेत विद्यार्थ्यांनी E-Waste आणि Plastic Waste चे दुष्परिणाम समजून घेत, घरातील नादुरुस्त E-Waste व Plastic Waste मोठ्या प्रमाणात जमा केले. हा कचरा पर्यावरणात न मिसळता पुनर्प्रक्रियेसाठी पाठवण्याचा उपक्रम राबवण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना टाकाऊ साहित्याचा पुनर्वापर आणि महापालिकेच्या 3R Centers विषयी माहिती देण्यात आली

📍 उपक्रमाची ठिकाणे:

नेरूळ गाव शाळा क्र. १० | जुईनगर शाळा क्र. १७ | शिरवणे शाळा क्र. १०१ व १५ | कुकशेत शाळा क्र. ९२ व १२१ | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्र. १२, सारसोळे | शिवाजी नगर, नेरूळ | एपीजे शाळा, नेरूळ | तसेच दिघा, सानपाडा, तुर्भे, घणसोली, ऐरोली, वाशी आणि कोपरखैरणे परिसरातील शाळा

मा. आयुक्त श्री. शिंदे साहेब, मा. अतिरिक्त आयुक्त श्री. पवार साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच मा. उप आयुक्त डॉ. अजय गडदे, मा. उप आयुक्त (परिमंडळ-१) डॉ. अमोल पालवे, मा. सह आयुक्त तथा विभाग अधिकारी नेरूळ डॉ. अनुराधा बाबर आणि मा. मुख्य स्वच्छता अधिकारी (परिमंडळ-१) श्री. नरेश अंधेर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

सदर प्रसंगी मा. स्वच्छता अधिकारी श्री. अरुण पाटील, शालेय विद्यार्थी, शिक्षकवृंद, स्वच्छता पर्यवेक्षक, स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.राखीचा धागा जपूया; स्वच्छता आणि पर्यावरणाशी आपलं नातं अधिक घट्ट करूया!

0000

संबंधित पोस्ट

इंडिगो आणखी अडचणीत– 5 वर्षांपूर्वीचं कोट्यवधींचं प्रकरण समोर, नोटिस जारी

vishwatmaklokswamivarta

भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाने देशभरात जल्लोष- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे-· भारतीय क्रिकेट संघाचे ऐतिहासिक विजयाबद्दल विधान परिषदेत अभिनंदन· भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाने क्रिकेट जगतात देशाचा अलौकिक गौरव

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

हाफकीन संस्थेच्या बळकटीकरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधितांची बैठक; खाजगीकरणाचा कोणताही विचार नाही – मंत्री नरहरी झिरवाळ

बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर , जळगांव तालुक्याला अवकाळी वादळी पावसाचा फटका…केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले जिल्हा प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश..

मोठी बातमी- जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याप्रकरणी दोन जणांना एनआयएकडून अटक