vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

अचूक मतदार यादीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी किशन जावळे**प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; नावांबाबत हरकती व दावे असल्यास सादर करावेत*

अचूक मतदार यादीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी किशन जावळे**प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; नावांबाबत हरकती व दावे असल्यास सादर करावेत*

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR 2026) प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी प्रारुप मतदार यादी तपासून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) नितीन वाघमारे उपस्थित होते.

मा.भारत निवडणूक आयोग यांच्याकडील निर्देशानुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघात दिनांक 01 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाच्या सुधारीत वेळापत्रकानुसार सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत अंमलबजावणी पार पाडण्यात येणार आहे

कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :-मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण/पुनर्रचना, सुधारीत वेळापत्रक, दि.24 ऑगस्ट 2026, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी सुधारीत वेळापत्रक, दि.31 ऑगस्ट 2026, दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी सुधारीत वेळापत्रक, दि.31 ऑगस्ट 2026 ते दि.30 सप्टेंबर 2026 . नोटीस टप्पा/दावे व हरकती निकालात काढणे सुधारीत वेळापत्रक, दि.31 ऑगस्ट 2026 ते दि.29 ऑक्टोबर 2026 . अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी दि.4 नोव्हेंबर 2026.

त्या अनुषंगाने जिल्हयातील 7 विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र ठिकाणी/पदनिर्देशित ठिकाणी मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत सोमवार दिनांक 31 ऑगस्ट, 2026 रोजी यादीभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यामध्ये digitization नंतर 19 लाख 49 हजार 341 इतके मतदार आढळून आलेले आहेत. त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

188 पनवेल विधानसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्रे 545, एकूण मतदार 6 लाख 84 हजार 095, गणना प्रपत्राचे डिजीटायझेशन झालेले मतदार 4 लाख 566, गणना प्रपत्राचे संकलन करता आले नाही असे मतदार 2 लाख 83 हजार 356, मॅप न झालेले मतदार 89 हजार 174, अनॉमाली 61 हजार 100

189 कर्जत विधानसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्रे 362, एकूण मतदार 3 लाख 19 हजार 337, गणना प्रपत्राचे डिजीटायझेशन झालेले मतदार 2 लाख 57 हजार 442, गणना प्रपत्राचे संकलन करता आले नाही असे मतदार 61 हजार 881, मॅप न झालेले मतदार 15 हजार 791, अनॉमाली 17 हजार 497.

190 उरण विधानसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्रे 352, एकूण मतदार 3 लाख 57 हजार 255, गणना प्रपत्राचे डिजीटायझेशन झालेले मतदार 2 लाख 72 हजार 772, गणना प्रपत्राचे संकलन करता आले नाही असे मतदार 84 हजार 416, मॅप न झालेले मतदार 37 हजार 227, अनॉमाली 21 हजार 419.

191 पेण विधानसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्रे 378, एकूण मतदार 3 लाख 5 हजार 343, गणना प्रपत्राचे डिजीटायझेशन झालेले मतदार 2 लाख 68 हजार 217, गणना प्रपत्राचे संकलन करता आले नाही असे मतदार 37 हजार 122, मॅप न झालेले मतदार 13 हजार 715, अनॉमाली 16 हजार 666.

192 अलिबाग विधानसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्रे 373, एकूण मतदार 3 लाख 9 हजार 580, गणना प्रपत्राचे डिजीटायझेशन झालेले मतदार 2 लाख 66 हजार 800, गणना प्रपत्राचे संकलन करता आले नाही असे मतदार 42 हजार 760, मॅप न झालेले मतदार 18 हजार 925, अनॉमाली 23 हजार 798.193 श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्रे 345, एकूण मतदार 3 लाख 62 हजार 680, गणना प्रपत्राचे डिजीटायझेशन झालेले मतदार 2 लाख 33 हजार 564, गणना प्रपत्राचे संकलन करता आले नाही असे मतदार 29 हजार 115, मॅप न झालेले मतदार 10 हजार 775, अनॉमाली 14 हजार 85.194 महाड विधानसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्रे 392, एकूण मतदार 2 लाख 95 हजार 449, गणना प्रपत्राचे डिजीटायझेशन झालेले मतदार 2 लाख 49 हजार 980, गणना प्रपत्राचे संकलन करता आले नाही असे मतदार 45 हजार 468, मॅप न झालेले मतदार 12 हजार 734, अनॉमाली 29 हजार 698

असे एकूण मतदान केंद्रे 2 हजार 747, एकूण मतदार 25 लाख 33 हजार 739, गणना प्रपत्राचे डिजीटायझेशन झालेले मतदार 19 लाख 49 हजार 341, गणना प्रपत्राचे संकलन करता आले नाही असे मतदार 5 लाख 84 हजार 118, मॅप न झालेले मतदार 1 लाख 98 हजार 341, अनॉमाली 1 लाख 84 हजार 263.ज्या पात्र मतदारांची नावे वर नमूद प्रारुप मतदार यादीमध्ये आढळून येणार नाही किंवा जे नव मतदार असतील त्यांना दावे व हरकती दिनांक 31 ऑगस्ट 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे दाखल करता येतील. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 (त्यासोबतच्या घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रासह) भरण्याची सुविधा उपलब्ध राहील. मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून सदर अर्जाची पडताळणी करुन पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील. या एका महिन्याच्या कालावधीत (दावे व हरकतीचा कालावधी) मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी संबंधित मतदार अनुक्रमे नमुना 6 किंवा नमुना 8 भरु शकेल. तसेच संबंधित मतदार संघातील कोणताही मतदार सदर यादीतील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना 7 भरुन हरकती घेऊ शकेल. राजकीय पक्षांना प्राप्त दावे व हरकतींची यादी प्रत्येक आठवडयास उपलब्ध करुन देण्यात येतील.मतदार नोंदणी अधिकारी/सहायक मतदान नोंदणी अधिकारी हे मतदारांनी केलेल्या दावे व हरकतीची सुनावणी दि.31 ऑगस्ट 2026 ते दि.29 ऑक्टोबर 2026 या कालावधीत घेऊन दावे व हरकतींवर निर्णय घेतील.अंतिम मतदार यादी दिनांक 04 नोव्हेंबर, 2026 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. मतदार नोंदणी अधिकारी यांच्या निर्णयाविरुध्द प्रसिध्दी दिनांकपासून 15 दिवसाचे आत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 मधील नियम 24 अंतर्गत अपीलीय अधिकारी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड यांच्याकडे स्वतः हजर राहून अपिल अर्ज दाखल करण्याबाबतची तरतूद आहे. तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड यांच्या निर्णयाविरूध्द मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड यांच्या निर्णयाचे दिनांकापासून 15 दिवसांचे आंत अंतिम अपील करू दाखल करू शकतात.

मतदार यादीच्या अनुषंगाने नाव समाविष्ट करणे, सुधारणा करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची घोषणा / विधान केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 च्या कलम 31 नुसार संबंधित व्यक्ती 1वर्षापर्यतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही यांना पात्र ठरते याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

 

0000000

संबंधित पोस्ट

भारतीय लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बीजे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · आणीबाणीच्या ५० वर्षानिमित्ताने संविधान हत्या दिवस कार्यक्रम · लोकतंत्र सेनानींचा सत्कार मुंबई, दि. २५ : देशातील लोकशाही ही सर्वोत्तम यंत्रणा आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लोकशाहीने महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे. सध्या भारत जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताच्या या वेगवान विकासात लोकशाहीने आपले महत्व अधोरेखित केले आहे. भारतीय परंपरेत मुळे असणारी लोकशाही अबाधित राहण्यासाठी आपण सर्वांनीच सहकार्य करूया, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण – भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय, संविधान हत्या दिवस २०२५ निमित्ताने लोकतंत्र सेनानींच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन राजभवन येथील दरबार सभागृहात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके उपस्थित होते. आणीबाणी ही प्रत्येक भारतीयाच्या मनातील सल असल्याचे सांगत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, आणीबाणी ही देशावर लादली गेली. या काळात देशविघातक कार्य झाले. जो कुणी आणीबाणीचा विरोध करेल त्याला कारागृहात डांबले जायचे. असह्य अत्याचार त्या काळात नागरिकांना सहन करावे लागले. आणीबाणीमुळे देशातील लोकशाहीवरच घाला घालण्यात आला. राज्यघटनेने दिलेल्या मुलभूत अधिकारांवर गदा आणण्यात आली. त्यातूनच आणीबाणीविरोधात जनमत तयार झाले. आपल्या विचारात, कार्यात व भविष्यातील योजनांमध्ये राष्ट्र प्रथम असले पाहिजे. स्वत:साठी न जगता राष्ट्रासाठी जगता आले पाहिजे. दुसऱ्यांसाठी जगा, हा मंत्र भारतीय लोकशाहीने दिला आहे. आज जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश आहे. भारत विकसित होण्याकडे आगेकूच करीत आहे. विकासाच्या प्रवासाचा इथपर्यंतचा टप्पा हा मजबूत लोकशाहीमुळेच शक्य झाला आहे, त्यामुळे लोकशाहीला अधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने निश्चय केला पाहिजे, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बीजे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणीबाणी ही भारतीय लोकशाहीवरील हल्ल्याचा प्रयत्न होता. मात्र लोकतंत्र सेनानींनी मोठा लढा देत हा प्रयत्न हाणून पाडला. त्यासाठी सेनानींना मोठा संघर्ष करावा लागला. या लोकतंत्र सेनानींना सन्मानाच्या, कृतज्ञतेच्या भावनेतून मानधन देवून शासन त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बिजे रोवली आहेत. आणि म्हणूनच आणीबाणीमुळे सेनानींचे कुठल्याही प्रकारचे मानसिक खच्चीकरण होवू शकले नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकतंत्र सेनानींचा गौरव केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशभरात सुधारणांसाठी आणीबाणीपूर्वी अनेक आंदोलने सुरू होती. या आंदोलनांचा धसका घेत तत्कालीन राजवटीने देशावर आणीबाणी लादली. ही आणीबाणी संविधानाच्या हत्येचे पातक ठरली. ४२ व्या घटनादुरूस्तीने संविधानाचा आत्माच काढण्याचे प्रयत्न झाले. मुलभूत अधिकार गोठवित मार्गदर्शक तत्वांना महत्व दिले गेले. या काळात भारतीय न्यायव्यवस्थेचेही महत्व कमी करण्यात आले.

जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा अभियानाला सुरूवात

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय खत विक्री आराखड्यांतर्गत आयएफएमएस व ॲग्रीस्टॅक प्रणालीचे एकत्रीकरणखत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता व सुलभता वाढणा खतांच्या मागणीसाठी सोईचे ॲप उपलब्ध होणार

श्री सिद्धिविनायक मंदिरात  ‘माघी गणेश जयंती महोत्सवा’ची सुरुवात; गायन, वादन, शोभायात्रांसह आठवडाभर भव्य सोहळा..

vishwatmaklokswamivarta

राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करणार – मंत्री आदिती तटकरे

केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रो प्रकल्पाच्या पाचव्या टप्प्याचा (ए) भाग असलेल्या तीन नव्या मार्गिकांच्या उभारणीला मंजुरी दिली

vishwatmaklokswamivarta