vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

आंध्र प्रदेशमध्ये गॅस गळतीमुळे रासायनिक कारखान्याला आग, 6 जणांचा मृत्यू, 12 जखमी

आंध्र प्रदेशमध्ये गॅस गळतीमुळे रासायनिक कारखान्याला आग, 6 जणांचा मृत्यू, 12 जखमी…

 

आंध्रप्रदेश प्रतिनिधीया अपघातात 12 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गॅस गळतीमुळे ही घटना घडली.

Fire in Chemical Factory : आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) एलुरु जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेम (Akkireddigudem) येथे एका रासायनिक कारखान्याला (Chemical Factory) लागलेल्या भीषण आगीत (Fire) सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 12 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गॅस गळतीमुळे ही घटना घडली.

एएनआय वृत्तसंस्थेनुसार, एलुरुचे एसपी राहुल देव शर्मा यांनी सांगितले की, नायट्रिक ऍसिड, मोनोमिथाइलच्या गळतीमुळे कारखान्याला आग लागली. आग लागली तेव्हा औषधनिर्मिती कारखान्याच्या युनिट 4 मध्ये अठरा जण काम करत होते. मृत्युमुखी पडलेल्या सहापैकी चार जण बिहारमधील स्थलांतरित कामगार होते. दोन तासांत आग आटोक्यात आणण्यात आली.

मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. तसेच गंभीर जखमींना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.

 

संबंधित पोस्ट

सांगलीत चार साधूंना बेदम मारहाण; पालघर घटनेची पुनरावृत्ती थोडक्यात टळलीया घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन वर्षापूर्वी पालघरमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती

vishwatmaklokswamivarta

ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील महामार्गावरील खड्डे, वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल..मुख्यमंत्री आज ठाणे-नाशिक महामार्गाची पाहणी करणार

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनी मध्ये सरळ प्रवेश व खेळ निहाय कौशल्य चाचणी प्रवेश प्रक्रिया सन 2025-26

महापुरुषांचा विचार ढणढनत ठेवायचा असेल तर चुल्हीत सतत विचारांची लाकडं घालावी लागतिल…आ सिद्धार्थ खरात

बाल कामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान; विविध कार्यक्रमाचे आयोजन

पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta