vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेला 15 हजार लोकांची परवानगी, आज तातडीची बैठक

 राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेला 15 हजार लोकांची परवानगी, आज तातडीची बैठक

औरंगाबाद प्रतिनिधी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळताच जोरदार तयारी सुरु झाली आहे. स्टेजचं काम संपत आले आहे. खुर्च्याही मैदानावर दाखल झाल्यायत. गुरुवारी रात्री उशिरा सभेसाठी परवानगी मिळाली. सभेला15हजार लोकांची परवानगी मिळालीय. पण जास्त लोक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियोजनाबाबत औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी आज दुपारी मनसे पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावले आहे.

 

राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील 1 मेच्या सभेला सशर्त परवानगी मिळाल्यानंतर मनसेनं जोरदार रणनीती आखली आहे. 1 मेला औरंगाबादला सभा, 2 मे रोजी महाआरती आणि 5 जूनला थेट अयोध्या दौऱ्यावर राज ठाकरे जाणार आहेत. तर औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेपूर्वी ते आजच पुण्यात रवाना होणार आहेत. तिथे औरंगाबादची सभा, महाआरती आणि अयोध्या दौऱ्याबाबत मनसे नेत्यांसोबत राज ठाकरे चर्चा करणार आहेत.

 

त्यानंतर उद्या राज ठाकरे औरंगाबादला रवाना होतील. राज ठाकरे यांनी सरकारला भोंग्यांवरून अल्टिमेटम दिलाय. 3 तारखेला अल्टिमेटम संपत असून, त्याच दिवशी मनसेने महाआरतीचे आयोजन केले आहे. त्यामुळे पोलिसांनीही राज्यभरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवली असून, सुरक्षेच्या दृष्टीनेही पुढील तीन ते चार दिवस खूप महत्त्वाचे असणार आहे.

संबंधित पोस्ट

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, चिपळूण-खेड-चांदेराईत पुराचे पाणी घुसले, व्यापारी धास्तावले

हरिभाऊ बागडे यांनी राष्ट्र निर्मितीसाठी समर्पित भावनेने कार्य केले, त्यांचे कार्य सर्वांसाठी दिशादर्शक – मंत्री नितीन गडकरी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा जिल्ह्याच्या वतीने अभीष्टचिंतन सोहळा संपन्न : ताम्रपात्र, जीवनपटाने वेधले सर्वांचे लक्ष 

vishwatmaklokswamivarta

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या चौकशीमध्ये एक धक्कादायक गौप्यस्फोट, अवघ्या १०० दिवसांत करोडपती धक्कादायकमाहिती..

कंगनाचा वाद बिहार-झारखंडच्या कोर्टातही पोहोचला, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी…

vishwatmaklokswamivarta

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा पाचवा दिवस !मंदिरांचे धन बँकेत जमा करण्याऐवजी जीर्ण मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी वापरा ! – गिरीश शहा, कार्यकारी विश्वस्त, समस्त महाजन संघ 

vishwatmaklokswamivarta

राज्यात जीबीएसचा धोका कायम; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कमी शिजवलेले चिकन खाणे टाळण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta