vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विनामास्क प्रवाशांवर कठोर कारवाई करा; कोर्टाचे आदेश

 विनामास्क प्रवाशांवर कठोर कारवाई करा; कोर्टाचे आदेश

मुंबई प्रतिनिधी

: कोरोनाच्या काळात मास्क सक्ती करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर ही मास्कबंदी हटवण्यात आली. सध्या पुन्हा कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसत असून अशा परिस्थितीत दिल्ली उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

 

या निर्णयानुसार, विमानतळ आणि विमानात मास्कशी संबंधित नियमांचं पालन न करणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई केली आहे. शुक्रवारी, न्यायालयाने खटल्याची सुनावणी करताना सांगितलंय की, विमानतळ आणि विमानात मास्क न घातल्याबद्दल प्रवाशांना ‘नो फ्लाइंग’च्या यादीत समाविष्ट करावं.

 

विमान प्रवासात आता मास्कची सक्ती केली जाणार आहे. देशात कोरोनाची संख्या वाढत असताना विमान प्रवासात आणि विमानतळ परिसरात कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्ली हायकोर्टाने दिलेत.

 

विना मास्क विमानप्रवाशांवर दंडात्मक कारवाई करा प्रसंगी प्रवाशांना विमानातून खाली उतरवा असे निर्देश दिल्ली हायकोर्टानं विमान कंपन्यांना दिलेत.

 

कोरोनाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने विमानतळ आणि विमानांमध्ये मास्कच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेत. विमानतळावर आणि विमानात मास्क न घालणाऱ्यांना मोठा दंड ठोठावण्यात यावा, असं न्यायालयाने म्हटलंय. यासोबतच न्यायालयाने DGCA ला विमानतळ आणि विमानातील कर्मचार्‍यांवर नियम न पाळल्याबद्दल प्रवाशांसह इतरांवर कारवाई करण्यास सांगितलंय.

संबंधित पोस्ट

राज्यातील पशुधनाचे ईअर टॅगिंग १ जूनपासून बंधनकारक…

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; भारतात येणाऱ्या – जाणाऱ्या सर्व प्रवासी विमानांचे उड्डाण बंद…

जुना दिल्ली येथील दुर्घटना,आझाद मार्केटमध्ये 4 मजली इमारत कोसळली, 8 कामगार दबल्याची शक्यता; अग्निशमन दलाच्या पथकाकडून बचावकार्य सुरू

vishwatmaklokswamivarta

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचाकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून आढावा..

मुंबईत विविध विकास प्रकल्पांची कामे सुरू.धारावी पूरमुक्तीचा खर्च १९० कोटींवर…!

vishwatmaklokswamivarta

राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ संपन्न परदेशात स्थलांतरित झालेली बुद्धीवान पिढी पुन्हा भारतात येण्याचा काळ येईल -राज्यपाल

vishwatmaklokswamivarta