
सततच्या पावसामध्ये चुनाभट्टी भागात कोसळली ,4 घरं; सुदैवाने जीवितहानी नाही…
मुंबई प्रतिनिधी
मुंबईत पावसाळ्यादरम्यान घर कोसळण्याच्या घटनांबाबत कालच आपत्ती व्यवस्थापन विभागाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झालेली आहे.
मुंबई मध्ये मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. या सततच्या पावसामध्ये चुनाभट्टी भागात 4 घरं कोसळल्याची दुर्घटना समोर आली आहे. सुदैवाची बाब म्हणजे या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना 1 जुलैच्या रात्रीची आहे. काही दिवसांपूर्वीच कुर्ला परिसरात बीएमसी ने नोटीस बजावलेली इमारत कोसळली आहे. त्यामध्ये 19 जणांनी प्राण गमावले आहेत.
मुंबई शहराचा संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस आजही सुरू आहे थांबून थांबून पावसाच्या सरी सर्वत्र पडत आहेत मात्र प्रत्येकाने आपली काळजी घ्याव असे आवाहन विश्वात्मक सामाजिक सेवा ट्रस्ट ही मुंबईकरांना करत आहे



