vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – भाजप सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची याचिका दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – भाजप सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची याचिका दाखल

मुंबई प्रतिनिधी

एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी राज्याचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनात शपथ दिली. त्याचबरोबर भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्ये उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे. या सरकारने विश्वास दर्शक ठरावही जिंकला. आता राज्यातील सत्ता स्थापनेला आक्षेप शिवसेने आक्षेप घेतला आहे. पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

 

शिवसेनेकडून बंडखोरी केलेल्या 16 आमदारांविरोधात कारवाई करण्यात आली होती. त्यांना अपात्र ठरविण्यात आले. याविरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला. यावेळी झालेल्या सुनावणीच्यावेळी 11 जुलैपर्यंत जैसे थी स्थिती ठेवण्यास सांगितले होते. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिंदे-भाजप सरकारला सरकार स्थापन करण्याची संधी दिली. राजभवनात आयोजित एका साध्या सोहळ्यात शिंदे आणि फडणवीस या दोन्ही नेत्यांना शपथ दिली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय उलथापालथही संपुष्टात आली आहे. मात्र, दोन्ही नेत्यांसोबत कोणीही मंत्रिपदाची शपथ घेतलेली नाही.

आता शिंदे – भाजप सरकार विरोधात याचिका दाखल करण्यात आली असून महाराष्ट्र राज्यातील सत्ता स्थापनेवर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. राज्यपालांची भूमिका आणि विधानसभा अध्यक्षांची निवड चुकीची आहे. शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी विधानसभा उपाध्यक्षांवरील अविश्वास ठराव आणि सदस्याच्या अपात्रतेचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना शिवसेनेकडून आणखी एक याचिका दाखल केली आहे. यात 3-4 जुलैला विधिमंडळ सभागृह बेकायदा पद्धतीने चालवलं, विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती बेकायदा आहे., राज्यपालांची भूमिकाही बेकायदा आहे, असा आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच जिल्हाध्यक्ष समर्थन प्रतिज्ञापत्र शिवसेना सादर करणार आहे.

 

त्याशिवाय शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह धनुष्य बाण वाचविण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे. शिवसेनेने जिल्हाध्यक्षांच्या समर्थनाचे प्रतिज्ञापत्र घेण्याचे काम सुरु केले आहे. या संदर्भात प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले जाणार आहे.

संबंधित पोस्ट

वाढत्या इंधनदरवाढिचे नितिन गडकरीं यांनी सांगितले कारण

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता आयटी ॲप्लिकेशन्सचे प्रशिक्षण संपन्न

vishwatmaklokswamivarta

कर्नाक पुलाचे सिंदूर नामकरण केल्याने काळ्या इतिहासाच्या खुणा पुसल्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ऐतिहासिक सिंदूर (कर्नाक) पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

भयमुक्त, कॉपीमुक्त परीक्षा संकल्पनेला बळ देण्याकरिता पुढाकार घेण्याचेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन,आत्मविश्वासाने, प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जा..दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

जम्मू काश्मीर: श्रीनगर मध्ये मध्ये कश्मिरी पंडितांनी साजरा केला जन्माष्टमीचा सण!

खोपोलीजवळ बोरघाटात खासगी बस दरीत कोसळल्यामुळे भीषण अपघात ,  12 जणांचा मृत्यू तर 29 जण जखमी..