
मुंबईकरांच्या तलावांतील जलसाठ्यात केवळ १२ टक्के तूट; पाणीसाठा ८८ टक्क्यांवर,
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात तलावांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या तलावांतील पाणीसाठा ८८.५० टक्क्यांवर पोहोचला
मुंबई प्रतिनिधी
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात केवळ १२ टक्के तूट आहे. तलावांच्या पाणलोटक्षेत्रामध्ये पावसाची रिमझिम सुरू असून सध्या सातही तलावांमध्ये ८८.५० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात केवळ १२ टक्के तूट आहे. तलावांच्या पाणलोटक्षेत्रामध्ये पावसाची रिमझिम सुरू असून सध्या सातही तलावांमध्ये ८८.५० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सातही तलावांमध्ये सध्या १२ लाख ८० हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
गेले काही दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात तलावांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या तलावांतील पाणीसाठा ८८.५० टक्क्यांवर पोहोचला आहे. जूनमध्ये पाऊस न पडल्यामुळे पाणीसाठा ९ टक्क्यापर्यंत खालावला होता. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात प्रचंड



