vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भाजपने शिवसेना संपवण्याचा डाव आखलाय, उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल…

भाजपने शिवसेना संपवण्याचा डाव आखलाय, उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल…

मुंबई प्रतिनिधी

भाजपला मुंबईवरुन भगवा हाटवून त्याना त्यांचा झेंडा लावायचा आहे पण अस कधी होणार नाही. ज्यांना शेंदूर लावला, ते शिवसेना गिळायला निघाले आहेत. त्यांना भाजपची साथ आहे, भाजपला अंदाज नाही, कोणत्या शक्तीसोबत पंगा घेतलाय, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

 

मुंबईतील शिवडी येथील शिवसेना शाखेचं उद्घघाटन करण्यासाठी उद्धव ठाकरे  उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. अरविंद सावंत, सुभाष देसाई, सचिन अहिर, किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकार  वर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनी भाजप (BJP) टीका करत म्हणाले की भाजप ही शिवसेनेला (Shivsena) संपवायला निघाली आहे. भाजपला ठाकरे आणि शिवसेना हे नातं संपवाचं आहे. याआधी अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. भाजपला मुंबईवरुन भगवा हाटवून त्याना त्यांचा झेंडा लावायचा आहे पण अस कधी होणार नाही. ज्यांना शेंदूर लावला, ते शिवसेना गिळायला निघाले आहेत. त्यांना भाजपची साथ आहे, भाजपला अंदाज नाही, कोणत्या शक्तीसोबत पंगा घेतलाय, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

 

किती वादळ आली तरी शिवसेनेची पाळं मुळं घट्ट आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले आहे.  जे गेले त्यांचं कोणत्या भाषेत वर्णन करायचं. बंडखोर काल म्हणाले आम्हाला गद्दार बोलू नका अशी विनंती त्यांनी केली. हे आम्ही नाही, त्यांनी त्यांच्या कपाळावर टिक्का लावून घेतलया गद्दाराचा. जे गेले आहेत, त्यांच्या बरोबर एकही शिवसैनिक गेला नाही, तसेच गद्दारांना कुठल्या ना कुठल्या पक्षात जाण्याशिवाय पर्याय नाही, असे अनेक तज्ज्ञ सांगतात. काल त्यांना एका पक्षाने ऑफर दिली आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर लगावला आहे.

2019 विधानसभा निवडणुकीच्या वेळी सत्तेचं वाटप 50 टक्के ठरलं होतं. जे ठरलं होतं ते आज त्यांनी केल. हेच तेव्हा केलं असतं तर सन्मानाने झालं असतं. जे आज मनावर दगड ठेवून करावं लागतं, ते करायची गरज आज पडली नसती. असा टोमणाही उद्धव ठाकरें यांनी केली आहे. अरविंद सावंत बऱ्याच दिवसापासून कार्यलायचं उद्घघाटन करण्यासाठी बोलवत होते. पण मी दुर्लक्ष करत होतो. पण आता दुर्लक्ष करुन चालणार नाही. आमदार-खासदार म्हणतात ते आता ऐकावं लागणार, कारण दिवसच असे आले आहे, असा खोचक टोमणा उद्धव ठाकरे शिंदे गटावर केला आहे.

 

संबंधित पोस्ट

आत्मनिर्भर भारत: लखनौ येथील उत्तर प्रदेश संरक्षण कॉरिडॉर अंतर्गत ब्रह्मोस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटी सेंटरमध्ये तयार करण्यात आलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या पहिल्या तुकडीला संरक्षण मंत्री आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

vishwatmaklokswamivarta

तुळजाभवानीच्या भक्तांसाठी मोठी बातमी; तुळजापूर रेल्वेने जोडण्यासाठी ४५२ कोटीची तरतूद; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना येत्या वर्षभरात स्वतःची इमारत देणार –महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

पंजाबमध्ये सुवर्ण मंदिर प्रवेशद्वारावर खलिस्तान समर्थकांची घोषणाबाजी, तलावारी आणि भिंद्रनवालेचे पोस्टरही झळकावले

कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये एरो इंडिया शो ला सुरुवात; एअर फोर्सने ‘हार्ट शेप’ एरोबॅटिक डिस्प्ले करत जिंकली सर्वांची मनं,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शो चे उद्घाटन केले

vishwatmaklokswamivarta

महत्त्वाची सूचना* मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी .