vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

टोलमाफीसंबंधी नितीन गडकरींची राज्यसभेत मोठी घोषणा….

टोलमाफीसंबंधी नितीन गडकरींची राज्यसभेत मोठी घोषणा….

 

नवी दिल्ली प्रतिनिधी १० किलोमीटर रस्त्याच्या वापरासाठी लोकांना ७५ किलोमीटरचा टोल भरावा लागतो, गडकरींनी मांडला मुद्दा

शहरातील टोल माफ केला जाणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

राज्यसभेत बोलताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली असून यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. १० किलोमीटर रस्त्याच्या वापरासाठी लोकांना ७५ किलोमीटरचा टोल भरावा लागतो असं नितीन गडकरींनी निदर्शनास आणून दिलं. हा मागील सरकारचा दोष आहे हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

 

नितीन गडकरी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नांना उत्तर देण्यासाठी उभे राहिले होते. राज्यसभेतील सदस्यांनी एक्स्प्रेस-वेवर शहरांच्या हद्दीत टोल प्लाझा उभारण्याचा मुद्दा उपस्थित करत चिंता व्यक्त केली होती.

स्थानिक नागरिकांनाही प्रवास करताना टोल भरावा लागत असल्याचा मुद्दा सदस्यांकडून मांडण्यात आला. यावेळी गडकरींनी शहरातील टोल माफ केला जाईल असं स्पष्ट केलं.

 

 

 

संबंधित पोस्ट

कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, पोलिसांकडून शिवाजी चौकातच ठिय्या आंदोलन करण्याचे आवाहन

होमगार्ड मध्ये सेवेसाठी अर्ज करण्याचे आवाहन*

कृषी कायद्यांत दुरुस्ती करण्यास केंद्र सरकार तयार असल्याने शरद पवार यांनी शेतकरी नेत्यांचे मन वळवून आंदोलन स्थगित करावे – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

भाजपा महिला मोर्चा मुंबई प्रदेश*आफताबला फाशी द्या, लव जिहाद रोखा! ,भाजपा महिला मोर्चाची स्वामी नारायण चौक दादर येथे तीव्र निदर्शने!

vishwatmaklokswamivarta

चिपळूणमध्ये भीषण पूरस्थिती, रेस्क्यू ऑपरेशनसाठी 2 हेलिकॉप्टर रवाना.

सातारा शहरातील रामदास स्वामींचे छत्रपती शिवाजी महाराज समवेत  चे शिल्प हटविण्याची मागणी….

vishwatmaklokswamivarta