vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सर्वोच्च न्यायालयात आजचा दिवस ऐतिहासिक, दोन घटनापीठे प्रलंबित घटल्यांवर करणार सुनावणी..

सर्वोच्च न्यायालयात आजचा दिवस ऐतिहासिक, दोन घटनापीठे प्रलंबित घटल्यांवर करणार सुनावणी…

नवी दिल्ली प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आजचा दिवस ऐतिहासिक असणार आहे. जवळपास अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि राज्यघटनेशी संबंधित असलेल्या प्रकरणांवर सुनावणी करण्यासाठी दोन वेगवेगळी खंडपीठे (Constitution Bench) नेमण्यात आली आहे. ही खंडपीठे वेगवेगळ्या प्रकरणांची सुनावणी करणार आहेत.

 

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आजचा दिवस ऐतिहासिक असणार आहे. जवळपास अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि राज्यघटनेशी संबंधित असलेल्या प्रकरणांवर सुनावणी करण्यासाठी दोन वेगवेगळी खंडपीठे (Constitution Bench) नेमण्यात आली आहे. ही खंडपीठे वेगवेगळ्या प्रकरणांची सुनावणी करणार आहेत. ज्यामुळे घटेनचा अर्थ लावण्याचे महत्त्वपूर्ण काम ही खंडपीठे करतील. प्रामुख्याने ईडब्ल्यूएस आरक्षणाची वैधता, मुस्लीम आरक्षण, मुस्लिमांमधील बहुविवाहपद्धती, निकाह हलाला आणि इतरही काही प्रकरणांवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील संत्तासंघर्षाचे प्रकरणही घटनापीठाकडेच गेले आहे. परंतू, त्यावर आज बहुदा सुनावणी होणार नाही.

 

दोन घटनापीठांपैकी पहिल्या घटनापिठाचे नेतृत्व हे सर्वोच्च न्यायालयाचे नवनिर्वाचीत न्यायमूर्ती यूयू ललित यांच्याकडे आहे. या खंडपीठात खंडपीठात न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, न्यायमूर्ती एसआर भट्ट, बेला माधुर्य त्रिवेदी आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या खंडपीठाचे नेतृत्व हे न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्याकडे असेल. बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठात न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांचा समावेश आहे

 

देशातील एखाद्या राज्याचे विधिमंडळ अथवा संसद यांमध्ये जेव्हा घटनात्मक पेच निर्माण होतो तेव्हा प्रकरण न्यायालयात पोहोचते. न्यायालयातही काही प्रकरणांमध्ये यावर अनेक न्यायमूर्तींनी विचार करुन निर्णय घ्यावा असे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाला वाटते तेव्हा सर्वोच्च न्यायालय अशी प्रकरणे घटनापीठाकडे सोपवते.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील माता-भगीनींना दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामराज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि बिबवेवाडी शाखेच्या वास्तूच्या कोनशीलेचे उद्घाटन

सरकार नोंद असलेल्या गावठाणांचा प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध-पालकमंत्री शंभूराज देसाई*

गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी – जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ

vishwatmaklokswamivarta

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या ठिकाणी भारताच्या विजयासाठी ‘शतचंडी यज्ञ’ आरंभ

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने बँकॉक येथे सकारात्मक स्पंदनांच्या महत्त्वाविषयीचे संशोधन सादर !सात्त्विक वृत्ती असलेले लोक आनंद, स्थिरता आणि शांतीचा अनुभव घेतात ! – शॉर्न क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय