vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नाना पटोलेंचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पटोल दिवसभर अशा काही-बाही गोष्टी बोलत असतात, त्या गांभीर्याने घ्यायच्या नसतात, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

  • नाना पटोलेंचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पटोल दिवसभर अशा काही-बाही गोष्टी बोलत असतात, त्या गांभीर्याने घ्यायच्या नसतात, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

  • पुन्हा प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (१७ सप्टेंबर)७२वा वाढदिवससाजरा केला जात आहे. भाजप शासित राज्यांमध्ये यानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.जगातील अनेक नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.एकीकडे मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानादुसरीकडे हा दिवस काँग्रेसकडून ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ म्हणून पाळला जात आहे. त्याचबरोबरकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखीलपंतप्रधान मोदी ओबीसी नाहीत, त्यांनी खोटी जात सांगितली असल्याचे म्हणतटीका केली आहे.यावरकाँग्रेसचे आंदोलन व नाना पटोलेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) प्रत्युत्तर दिले आहे.

 

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की,नाना पटोलेंचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पटोल दिवसभर अशा काही-बाही गोष्टी बोलत असतात,त्या गांभीर्याने घ्यायच्या नसतात. त्यामुळे तुम्ही देखील गांभीर्याने घेऊ नका. नाना पटोलेंना असे झटके येत असतात. त्यामुळे ते असे काही बोलत असतात.

काँग्रेसबाबत बोलतानाफडणवीस म्हणाले की,काँग्रेसचे स्थान जनतेतही नाही आणि संसदेतही नाही. त्यामुळेकाँग्रेस आपली जागा शोधत आहे. काँग्रेसचं अस्तित्व कमीकमी होतचाललंआहे. त्यामुळे त्यांनी एकच धोरण अवलंबण्यास सुरुवात केली आहे,ते म्हणजे प्रत्येक गोष्टीला विरोध करणे. देशातील लोकांनी चित्त्यांचं स्वागत केलं आहे. मात्र काँग्रेसमध्ये केवळ नकारात्मकता भरलेली आहे. त्यांनी याला विरोध केला. मिशन चित्ता अंतर्गत आज मोदींच्या वाढदिवसानिमित्त मोदींच्या हस्ते नामिबियातून भारतात आणलेले ८ चित्ते मध्य प्रदेशातील अभयारण्यात सोडले

देशातील जनतेला वाटतं आपले पंतप्रधान हे ओबीसी आहेत. पण तसं नाही. काँग्रेसचे प्रवक्ते शक्तीसिंह गोहिल हे लवकरच प्रत्येक राज्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देणार आहेत. या संदर्भातील सर्व कागदपत्रे ते सादर करणार आहेत. मोदी हे गुजरातमधील श्रीमंत जातींपैकी आहेत. ओबीसी समाजाची मतं मिळवण्यासाठी भाजपनं त्यांना तसं प्रोजेक्ट केलं आहे,’असा आरोपही पटोले यांनी केला.

संबंधित पोस्ट

बृहन्मुंबई शहरामध्ये हद्दीत 5 जानेवारीपर्यंत जमावबंदी

vishwatmaklokswamivarta

आरबीआयची मोठी कारवाई, पेटीएमची बँकिंग सर्व्हिस 29 फेब्रुवारीनंतर बंद

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

vishwatmaklokswamivarta

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरु; राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर राज्याकडे देशाचे लक्ष्य

vishwatmaklokswamivarta

हिंदूंचे व्होट बँकेत रूपांतर झाले पाहिजे आणि राजकारणाचे हिंदूकरण झाले पाहिजे,जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतरावर कडक कारवाई करण्याची आणि लव्ह जिहादविरोधात  कायदा आणण्याची मागणीही त्यांनी केली..कालीचरण महाराजांच

vishwatmaklokswamivarta

दिव्यांगांच्या हक्कांच्या प्रभावी संरक्षणासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तांची कार्यपद्धती निश्चित सचिव तुकाराम मुंढे यांची माहिती

vishwatmaklokswamivarta