vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज तब्बल १ वर्ष १ महिना आणि २६ दिवसांच्या कोठडीनंतर सुटका होणार

.महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज तब्बल १ वर्ष १ महिना आणि २६ दिवसांच्या कोठडीनंतर सुटका होणार

मुंबई प्रतिनिधी

गेले अनेक तुरुंगात वास्तव्यास असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अखेर १ वर्ष १ महिन्यांच्या दिर्घ कालावधीनंतर आज अनिल देशमुखांची अखेर सुटका होणार आहे. यामुळे कार्यकर्त्यात जल्लोष निर्माण झालेला आहे

 

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज तब्बल १ वर्ष १ महिना आणि २६ दिवसांच्या कोठडीनंतर सुटका होणार आहे. १ नोव्हेंबर २०२१ रोजी अनिल देशमुखांना १०० कोटींच्या कथित घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. अजूनही या प्रकरणी सीबीआय चौकशी सुरु असुन १०० कोटींचा खटला मुंबई उच्च न्यायालयात सुरु आहे. तर काल कोर्टाकडून अनिल देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला असुन आज आर्थर रोड जेलमधून देशमुखांची सुटका होणार आहे. राष्ट्रवादी पक्षात आज उत्साहाचं वातावरण आहे. देशमुखांच्या सुटकेनंतर आर्थर रोड जेल ते सिध्दीविनायक मंदीर अशी रॅली काढण्यात येणार आहे. राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. कालचं अधिवेशनात एकमताने महाराष्ट्र-कर्नाटक सिमावाद कर्नाटक विरोधी उठाव विधान सभेत एकमताने मंजूर झाला. तरी आज देशमुखांच्या सुटकेचे अधिवेशनात काय पडसाद उमटणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयानं देशमुखांच्या जामीनाला दिलेली वाढीव स्थगिती संपली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी  होईपर्यंत अनिल देशमुखांच्या जामिनावरची स्थगिती वाढवा, अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आली होती. मात्र जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली असुन अखेर १ वर्ष १ महिन्यांच्या दिर्घ कालावधीनंतर आज अनिल देशमुखांची अखेर सुटका होणार आहे.

 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी  केला होता. त्यानंतर या प्रकरणाला अनेक फाटे फुटले. ईडीनं देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली पण काल मात्र अनिल देशमुखांची जामीन मंजूर झाला असुन त्यांची आज सुटका होणार आहे

 

 

संबंधित पोस्ट

शहरातील घाणीचे साम्राज्य, डेंग्यू,गॅस्ट्रोच्या मुद्द्यावर आ.कैलास गोरंटयाल आक्रमक ,मनपामध्ये जाऊन विचारला आयुक्तांना जाब @ कामात सुधारणा करा नसता आंदोलनाचा इशारा.

वृक्षारोपण व संवर्धन सामाजिक जबाबदारी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदार मेळावा.

vishwatmaklokswamivarta

पी.एम.किसान “एपीके” लिंक उघडताच शेतकऱ्यांची बैंक खाती होताहेत रिकामी-फसव्या पीएम किसान ॲप्लीकेशन, लिंकपासून सावध रहा

निवडणूक विषयक कामकाज नियमानुसार असावे याची काळजी घ्या-विभागीय आयुक्त दिलीप गावडेजिल्हा व विधानसभास्तरीय मास्टर ट्रेंनरचे प्रशिक्षण..

जालना जिल्हयातील ८७ हजार ८३१ शेतक-यांच्या खात्यात ९८.५० कोटी रक्कम जमा 

मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित ‘विधानसभा निवडणूक विशेष वार्तालाप मालिका’ उत्सव लोकशाहीचा २०२४ या मालिकेच्या पहिल्या भागात अनिल परब काय म्हणाले ते पहा

vishwatmaklokswamivarta