vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

काँग्रेस चे नेते बाळासाहेब थोरात यांनी बंडाची भूमिका घेतली,  संजय राऊतशिवसेना खासदार

काँग्रेस चे नेते बाळासाहेब थोरात यांनी बंडाची भूमिका घेतली,  संजय राऊत

शिवसेना खासदार

 

राजकीय प्रतिनिधी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील दुफळी समोर आली आहे. थोरात यांनी अचानक निर्णय घेतल्याने राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील दुफळी समोर आली आहे. थोरात यांनी अचानक निर्णय घेतल्याने राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र, बाळासाहेब थोरात शांत आणि संयमी आहेत. चारित्र्य संपन्न नेते आहेत. त्यांनी बंडाची भूमिका घेतली म्हणजे नक्कीच ते मनातून दुखावले असणार असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या कुटुंबांना मी ओळखतो. त्यांच्या नसानसात काँग्रेस आहे. त्यांनी राजीनामा देणं हा त्यांच्या पक्षांतर्गत वाद आहे. आम्ही भाष्य यासाठी करतो कारण काँग्रेस महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष आहे. त्यांच्या पक्षात स्थिर स्थावर असावं असं वाटतं. या प्रश्नात काँग्रेस हायकमांड लक्ष घालेल. या वादावर आम्ही बोलणं योग्य नाही, असं संजय राऊत म्हणाले.

पक्ष त्यांची भूमिका जाणून घेईल

संयमी आणि स्वच्छ चारित्र्यांचे थोरात हे नेते आहेत. थोरातांसारख्या नेत्याने बंडाची भूमिका घ्यावी याचा अर्थ नक्कीच ते मनातून दुखावले आहेत. अस्वस्थ आहेत. म्हणून त्यांची भूमिका त्यांचा पक्ष जाणून घेईल. एवढंच बोलू शकतो, असं ते म्हणाले.

 

संबंधित पोस्ट

भाजपा आमदार गणपत गायकवाडांना अटक; पोलीस ठाण्यातच वैद्यकीय तपासणी

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूरच्या विकासावर भाष्य करताना हद्दवाढ किती अत्यावश्यक असल्याचे सांगत हात जोडले… उपमुख्यमंत्री अजित पवारांनी  

vishwatmaklokswamivarta

दिल्लीत महत्वाची घडामोड; पीएम मोदी – पवार भेट तर अमित शाह – फडणवीस यांच्यात चर्चा.

राज्यसभेच्या निवडणुकीत: संजय राऊत म्हणाले- आमच्या 4 उमेदवारांचा विजय निश्चित

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसंवादद्वारे जनतेच्या समस्या घेतल्या जाणून नियमाकुल प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यामुळे मुंबईचा समुद्र काळवंडला, एन जी टी च्या दंडावर आमदार अमित साटम यांनी सोडले टीकास्त्र…

vishwatmaklokswamivarta