vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना शिवडी कोर्टाचे समन्स, 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश…

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना शिवडी कोर्टाचे समन्स, 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश…

मुंबई प्रतिनिधी

मुंबई येथील शिवडी कोर्टाने शिवसेना  चे नेते उद्धव ठाकरे (आणि संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. या समन्सनुसार येत्या 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत…

मुंबई येथील शिवडी कोर्टाने  शिवसेना  चे नेते उद्धव ठाकरे  आणि संजय राऊत  यांना समन्स बजावले आहे. या समन्सनुसार येत्या 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना  मुखपत्र अशी ओळख असलेल्या दैनिक सामनामध्ये  आपल्याबद्दल अवमानकारक मजकूर छापल्याचा दावा शिवसेना गटाचे खासदार राहुल शेवाळे  यांनी केला आहे. यावरुनच त्यांनी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावरुन शिवसेना (UBT) नेत्यांच्या सर्वोच्च आणि महत्त्वाच्या नेत्याला समन्स बजावण्यात आले आहे. जे सामना वृत्तपत्राचे संपादक आणि कार्यकारी संपादक आहेत.

मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघाचे खासदार शेवाळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट (शिवरी कोर्ट) एस बी काळे यांनी सोमवारी हे समन्स जारी केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ठाकरे आणि राज्यसभा खासदार राऊत यांना 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाशी संबंधित असलेल्या शेवाळे यांनी या दोन्ही नेत्यांवर भारतीय दंड संहिता कलम 500 (बदनामीसाठी शिक्षा) आणि 501 (मुद्रण किंवा बदनामी करणे) बदनामीकारक लेख छापल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘सामना’च्या मराठी आणि हिंदी आवृत्तीत आपल्याविरोधात बदनामीकारक मजकूर छापल्याचा शेवाळे यांचा दावा आहे.

उद्धव ठाकरे हे सामनाचे मुख्य संपादक आहेत तर राऊत हे कार्यकारी संपादक आहेत. वकील चित्रा साळुंके यांच्यामार्फत दाखल केलेल्या तक्रारीत शेवाळे यांनी 29 डिसेंबर 2022 रोजी प्रकाशित झालेल्या सामनाच्या अंकाचा उल्लेख केला आहे. ज्यात `राहुल शेवाळे यांचा कराचीमध्ये हॉटेल, रिअल इस्टेट व्यवसाय आहे’ या मथळ्यासह लेख प्रकाशित करण्यात आला होता. यावरच शेवाळे यांचा आक्षेप आहे.

दरम्यान, सामनातून करण्यात आलेल्या आरोपाचे राहुल शेवाळे यांनी खंडण केले आहे. या लेखातील सर्व आरोप आपल्या प्रतिष्ठेला आणि राजकीय कारकीर्दीला हानी पोहोचवण्याचा हा केवळ एक निष्फळ प्रयत्न आहे. लोकांसमोर त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आल्याचे शेवाळे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांदरम्यान पैशांच्या गैरवापरावर नजर ठेवण्यासाठी आयकर विभागाचा 24×7 कार्यरत नियंत्रण कक्ष

vishwatmaklokswamivarta

अवैधरित्या शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या 121 वाहनांवर मोटार वाहन कायदा 1988 व शालेय स्कूल बस नियमावली 2011 नुसार थेट कारवाई*

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा शुभारंभ..

vishwatmaklokswamivarta

अवयवदान’ ही मानवतेची व सामाजिक बदलाची चळवळ व्हावी- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

आदर्श आचारसंहिता पालनासाठी दक्ष रहावे-विकास मीना

vishwatmaklokswamivarta

बिहारमधील बावनबुटी साडी बनवणाऱ्या विणकर महिलांच्या आर्थिक उन्नतीमध्ये योगदानाबद्दल गौरव जानकीदेवी बजाज पुरस्काराने वीणा उपाध्याय राज्यपालांच्या हस्ते सन्मानित