vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र राज्यात राजकीय भूकंपानंतर आज ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांच्या वेगवेगळ्या बैठका…

महाराष्ट्र राज्यात राजकीय भूकंपानंतर आज ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांच्या वेगवेगळ्या बैठका…

 

राज्य प्रतिनिधी

शिवसेना पक्षापाठोपाठ आता शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही बंडखोरी झाली. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले. या पार्श्वभूमीवर आजचा दिवस महत्त्वाचा ठरत आहे. आज राजकीय पक्षांनी बैठकांचा धडाका लावला आहे.

आता शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही बंडखोरी झाली. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले. या पार्श्वभूमीवर आजचा दिवस महत्त्वाचा ठरत आहे. आज राजकीय पक्षांनी बैठकांचा धडाका लावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना (UBT) पक्षाची तर बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या विविध नेत्यांची अशा दोन वेगवेगळ्या बैठका पार पडत आहेत. या बैठकांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा होते याबाबत उत्सुकता आहे.

उद्धव ठाकरे गटाची बैठक शिवसेना भवन येथे आज दुपारी 12.30 वाजता पार पडत आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे गटाचे आमदार, खासदार आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी आगामी निवडणुका महाविकासआघाडीतच  लढायच्या की, आपला एकला चलोरेचा मार्ग अनुसरायचा यावर विचार होण्याची शक्यता आहे. बैठक झाल्यावर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेतच उद्धव ठाकरे आपली भूमिका व्यक्त करतील असे समजते

अजित पवार यांच्या शपथ विधीनंतर राज्यात राजकीय वातावरण तापले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये अजित पवार यांच्या शपथविधीने जोरदार अस्वस्थता पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्यामुळे सत्तासमिकरणे बिघडली आहेत. शिंदे गटाचे महत्त्व कमी झाले आहे, असे अनेकांना वाटते. त्यामुळे या बैठकीत अनेकांनी आपली भावना एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचविल्याचे समजते.

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढविण्यासोबतच सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी काम करावे-उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नारायणगाव पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे लोकार्पण..

ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळाले महिला बचत गटांनी शिवलेले शालेय गणवेश ठाणे जिल्ह्यातील बचत गटांमार्फत 1,04,703 गणवेश होणार तयार

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, रासपच्या जिल्हाध्यक्षांसह दोघांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगर येथील घटना..

सिक्कीममध्ये भूस्खलनामुळे अनेक घरे कोसळली, रस्ते वाहून गेले, बचाव दलाकडून 300 गावकऱ्यांची सुटका पर्यटकांना सुरक्षा सुरक्षित स्थळी…

सी.पी. राधाकृष्णन यांचा भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून शपथविधी संपन्न राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पदाची आणि गोपनीयतेची शपथ..

vishwatmaklokswamivarta