
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्या 7 तलावांपैकी 3 तलावं ओसंडून वाहायला लागले पाणी कपात दूर होण्याची शक्यता…
मुंबई प्रतिनिधी
मुंबई मध्ये सध्या 10% पाणीकपात लागू आहे. परंतू मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलावक्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने त्यात होणारी वाढ आनंददायक आहे.
मुंबई मध्ये जुलैच्या मध्यानंतर दमदार पावसाला सुरूवात झाली आणि आता मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्या 7 तलावांपैकी 3 तलावं ओसंडून वाहायला देखील सुरूवात झाली आहे
मुंबई मध्ये जुलैच्या मध्यानंतर दमदार पावसाला सुरूवात झाली आणि आता मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्या 7 तलावांपैकी 3 तलावं ओसंडून वाहायला देखील सुरूवात झाली आहे. मध्यरात्री विहार नंतर पहाटे तानसा देखील ओव्हर फ्लो झाल्याची माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली 10% पाणीकपात लवकरच दूर होईल अशी नागरिकांना अपेक्षा आहे.



