vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राष्ट्रपतींनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले- विधानपरिषद उपसभापती डॉ. गोऱ्हे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांची भेट

राष्ट्रपतींनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले- विधानपरिषद उपसभापती डॉ. गोऱ्हे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांची भेट

 

 

 

पुणे, प्रतिनिधी: राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सोमवारी (दि. 6) नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सव कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रपती महोदयांना दिले. या निमंत्रणाचा तात्काळ स्वीकार राष्ट्रपतींनी केला असून या कार्यक्रमास त्या उपस्थित राहणार असल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

 

 

 

महाराष्ट्र विधान परिषदेला 2021 मध्ये 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1919 च्या भारतीय कायद्यानुसार 1921 मध्ये भारतातील पहिली विधान परिषद मुंबई प्रांतात स्थापन झाली. 2021 मध्ये कोरोना सारखा गंभीर आजार असल्याने या शतकमहोत्सवी वर्षात कोणताही कार्यक्रम आयोजित करता आला नाही. त्यामुळे यावर्षी विधान परिषदेचा शतक महोत्सव साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रपती महोदयांना देण्यात आले, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

 

 

 

या शतक महोत्सवी कार्यक्रमाची पूर्व तयारी म्हणून 8 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वा विधान परिषदेच्या जुन्या सदस्यांसाठी व नवीन सदस्यांसाठी एक दिवसाची पूर्व तयारीची कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रसाद लोढा उपस्थित राहणार आहेत.

 

 

 

या कार्यक्रमाला जवळपास 100 माजी सदस्य उपस्थित राहणार आहेत. तसेच विधानपरिषदेतील कामकाजासंदर्भात विविध विषयावर 5 पुस्तके करण्यात येणार आहेत. यासाठी विधान परिषदमध्ये अनेक वर्षे काम करणाऱ्या जेष्ठ पत्रकारांच्या 5 समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत, अशी माहितीही डॉ. गोऱ्हे यांनी दिली.

संबंधित पोस्ट

कृषी विज्ञान या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य आयोजित उपक्रम;बुलढाणा कृषी विज्ञान केंद्र येथे कृषक सुवर्ण समृद्धी सप्ताहाचे थाटात उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा मुद्द्यावरून मुख्यमंत्र्याची राजीनामाची मागणी

vishwatmaklokswamivarta

महापारेषणच्या विविध मंजूर प्रकल्पाची कामे तातडीने पूर्ण करावीत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गाव तेथे वड’ अभियानाचा उत्साहात प्रारंभपर्यावरण रक्षणासाठी एकजुटीने प्रयत्न करु- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

पर्यावरण संवर्धनासाठी बांबू लागवड उपयुक्त- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बांबू लागवड, उत्पादन व संवर्धनासाठी मोबाईल जनजागृतीचे लोकार्पण..

श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश !**16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !*