vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

नविन वर्षातील सर्वात मोठा राजकीय गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामत आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील…

नविन वर्षातील सर्वात मोठा राजकीय गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामत आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील…

 

राज्य प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणात येत्या काळात मोठ्या नाट्यमय घडामोडी पहायला मिळणार आहेत. नविन वर्षातील सर्वात मोठा राजकीय गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामत आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. शिंदे गटाचे खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणुक लढवणार आहेत. तर, काँग्रेसचे नऊ नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

शिंदे गटाचे सात खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केलाय. तसं लेखीही या खासदारांनी दिल्याचं त्यांचं म्हणणंय. तर काँग्रेसचेच ९ लोकं मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून ते धनुष्यबाणावर लढण्यास इच्छुक असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामतांनी केलाय.

 

पक्षांतरावरुन भाजप आणि ठाकरे गटामध्ये चांगलीच जुंपली

पक्षांतरावरुन भाजप आणि ठाकरे गटामध्ये चांगलीच जुंपलीय. काँग्रेसमधले अनेक जण भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. काँग्रेसमधल्या अनेक लोकांना भाजपात येण्याची इच्छा असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलंय. त्यावरुन संजय राऊतांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका केलीय. उद्या भाजपकडे सत्ता नसेल तेव्हा ते कुठे असतील हा त्यांनी विचार करावा असा टोला राऊतांनी लगावलाय.

 

स्वाभीमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार

स्वाभीमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टींनी केलीय. मविआशी आपल्याला काहीही देणघेणं नसल्याचं त्यांनी सांगितलंय. उद्धव ठाकरेंसोबत आपण शेतक-यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आलो होते असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर राजू शेट्टींच्या भूमिकेचा आदर करायला हवा अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिलीय.

 

रुपाली चाकणकरांनी किमान नगरसेवक तरी होऊन दाखवावं… शरद पवार गटाचं आव्हान

रुपाली चाकणकरांनी किमान नगरसेवक तरी होऊन दाखवावं असं थेट आव्हान शरद पवार गटाने दिलंय. शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंनी हे आव्हान दिलंय. सुप्रिया सुळे गेली 15 वर्षे अजितदादांमुळेच निवडून आल्यायत. आता अजितदादा सोबत नाही म्हणून बारामतीत तळ ठोकावा लागतोय असं विधान काल रुपाली चाकणकरांनी केलं होतं. त्यावरुनच आता रोहिणी खडसेंनी चाकणकरांवर निशाणा साधलाय.

संबंधित पोस्ट

अदानी मुद्द्यावर संसदेत चर्चा होऊ नये यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. अदानी प्रकरणावर संसदेत चर्चा होऊ नये, अशी सरकारची इच्छा आहे काँग्रेस खासदार राहुल गांधी

vishwatmaklokswamivarta

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला यांच्या वाढदिवसानिमित्ताने औरंगजेबाचं प्रिंट असलेला केक …

मुख्यमंत्री भाजपाचा होणार परंतु ते कोण अजूनही गुलदस्त्यात! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून नेमकी माघार का? राजकीय वर्तुळात चर्चा…

vishwatmaklokswamivarta

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली**शिवसेना लॉटरी विक्रेता सेना,लॉटरी बचाव कृती समितीची* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पार पडली बैठक*

vishwatmaklokswamivarta

अनीक्षा जयसिंघानी प्रकरण: राजकीय व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता..

भाजपला शिवसेनेसोबत युती नको होती; एकनाथ खडसेंनी