vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठा आरक्षण यात्रेचा पाचवा दिवस :मराठा आरक्षण यात्रेदरम्यान नवी मुंबईत वाहनांना बंदी; 26 जानेवारी रात्री 11 पर्यंत अवजड वाहनांवर रोख

मराठा आरक्षण यात्रेचा पाचवा दिवस :मराठा आरक्षण यात्रेदरम्यान नवी मुंबईत वाहनांना बंदी; 26 जानेवारी रात्री 11 पर्यंत अवजड वाहनांवर बंदी.

 

राज्य प्रतिनिधी

मराठा आरक्षण यात्रेचा आज पाचवा दिवस आहे. जरांगेचा पाटलांचा आज लोणावळ्यात मुक्काम असणार आहे. आरक्षण मिळवळेपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार करून त्यांनी या यात्रेला सुरुवात केलेली आहे मागील चार दिवसापासून अनेक खेडोपाऱ्यातून त्यांची यात्रा आता लोणावळ्यापर्यंत आलेली आहे आणि ते सध्या तेथे मुक्कामी आहेत पुढील मार्ग माहितीनुसार सूत्रा ची माहिती आहे

मराठा आरक्षणाच्या  मागणीसाठी मनोज जरांगेंची पदयात्रा 25 जानेवारी रोजी नवी मुंबई  पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल होणार आहे. यासाठी 25 जानेवारीला रात्री 12 ते 26 जानेवारीला रात्री 11 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याशिवाय वाहनं उभी करण्यास तसंच शहरातील सर्व मार्गावरुन मार्गस्थ होण्यास बंदी आहे. वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे

मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आज पाचवा दिवस आहे. जरांगेचा आज लोणावळ्यात मुक्काम असणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार जरांगेंनी केला आहे. आरक्षणासाठी गोळ्या झेलायलाही तयार आहे असा थेट इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला आहे. या मोर्चात शेकडोच्या संख्येने मराठा बांधवही सहभागी झाले. जालनाच्या अंतरवाली सराटीतून निघालेला मोर्चा बीडवरुन, अहमदनगरमार्गे पुण्यात दाखल झाले.

 

गुरुवार 25 जानेवारी रोजी हा मोर्चा नवी मुंबईत धडकणार आहे. त्यावेळी मराठा आंदोलकांच्या मुक्कामाची सोय ही नवी मुंबईत करण्यात आली आहे. नवी मुंबईतली मैदानं, सामाजिक सभागृहं, शाळा, एपीएमसी मार्केट या ठिकाणी मराठा आंदोलकांच्या निवासाची, जेवणाची आणि त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडामराठी भाषेचे जतन व संवर्धनाची चळवळ-सर्व शासकीय कार्यालयातून उभारावी

vishwatmaklokswamivarta

हिम्मत असेल तर महिन्याभरात मुंबई महापालिकेची व महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक घेऊन दाखवा’; उद्धव ठाकरे यांचे अमित शहांना आव्हान

vishwatmaklokswamivarta

शासनातर्फे सुरू असलेला १५० दिवसांचा कार्यक्रम ही प्रशासकीय मोहीम नसून जनतेशी शासनाला जोडणारा सेतू आहे – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार

विशेष साहाय्य विभागाच्या जनकल्याण यात्रेचा शुभारंभ जनकल्याण यात्रेद्वारे योजनांचा होणार जागर : मंत्री नरहरी झिरवाळ

छत्रपती संभाजीनगर कारागृहाला प्रधान सचिव राधिका रस्तोगी यांची भेट

युद्ध पार्श्वभूमीवर सर्व आपत्कालीन कार्य केंद्र 24X7 कार्यरत ठेवावे*– *निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के*